हाडं गोठवणारी हुडहुडी कुणाचं टेन्शन वाढवते ? तर हाडे गोठवणारी हुडहुडी कुणाच्या पथ्यावर ?

नाशिकमधील वाढती थंडी काही शेतकऱ्यांना फलदायी ठरत असून काही शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बाब ठरत आहे, सहा अंशाच्या जवळ पारा पोहचला असून येत्या काळात आणखी तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे.

हाडं गोठवणारी हुडहुडी कुणाचं टेन्शन वाढवते ? तर हाडे गोठवणारी हुडहुडी कुणाच्या पथ्यावर ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 10:02 AM

नाशिक : राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पारा जवळपास 6 अंशाच्या खाली आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक थंडी महाबळेश्वर पेक्षाही नाशिकमध्ये पडू लागली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला असून शेती पिकाचे काय होईल अशी चिंता व्यक्त करू लागला आहे. नाशिकमधील तापमानाचा पारा घसरल्याने काही शेतकऱ्यांना फायदा होतो तर काही शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतो. यामध्ये थंडीचा जोर जसा-जसा वाढत जातो तस-तसा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत जातात. थंडीमुळे द्राक्ष मण्याला तडे जातात. त्यामुळे द्राक्ष बागा वाचवायच्या यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जातात. तर दुसरीकडे हरभरा, कांदे या पिकांना मात्र थंडीचा दिलासा भेटत असतो. पिकाची फुगवण होण्यासाठी थंडी फायदेशीर ठरत असते. त्यामुळे राज्यातील थंडीचा नाशिकमधील शेतकऱ्यांना फायदा आणि तोटा असा दुहेरी भावना निर्माण होत असते.

नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढला की द्राक्ष बागेत पाणी सोडणे, धूर करणे, पोग्यात पाणी जाऊ नये यासाठी बागा झटकणे, औषध फवारणी करणे अशी विविध कामे करावी लागतात.

पहाटेच्या थंडीने तर अक्षरशः द्राक्ष मनी कडक झाल्याने त्यांना तडे जाऊन ते जमिनीवर पडत असतात, त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास जातो की काय अशी स्थिती निर्माण होते.

हे सुद्धा वाचा

त्यातच दुसरींकडे डाळिंब या पिकावर रोगराई पसरल्याने औषध फवारणी करावी लागते, त्यामुळे द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतेत असतात.

तर दुसरीकडे गहू, हरभरा आणि कांदा या पिकाला थंडी फलदायी असते, थंडीने ही पिके अधिक जोमाने येतात, त्यामुळे पारा घसरला तरी या पीक उत्पादक शेतकऱ्यांना चिंतेचे कारण नाही.

मात्र, याच काळात जर अधिकच्या थंडीने धुके पसरले तर जवळपास सर्वच पिकांवर औषध फवारणी करावी लागते, पिकावर रोग येण्याची शक्यता अधिक असते, त्यात द्राक्ष आणि डाळिंब आणि कांदे या पिकांची काळजी घ्यावी लागते.

नाशिक जिल्ह्यातील ही प्रमुख पिके असल्याने नाशिकमधील थंडी शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची असते, सध्याची थंडी मात्र डोकदुखी ठरत आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.