मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची नेतेपदी नियुक्ती केली आहे. जाधव हे गेल्या काही वर्षांपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. पण आता त्यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याने जाधव यांच्या तोडीस तोड असा मनसैनिक कोण असेल ज्याला ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येऊ शकते? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालीय.