माजी मंत्री अनिल परब यांचे रत्नागिरी येथे रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट उभारण्यासाठी काळा पैसा वापरला गेल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे तर भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत त्यावर कारवाई झालेली नाही.