मी या पत्रकारीता क्षेत्रात गेली ८ ते ९ वर्ष काम करत आहे. यापैकी ६ एक वर्ष वेब विभागात कामं करत आहे. तर गेली दीड एक वर्ष TV 9 मराठीच्या वेब विभागात उपसंपादक म्हणून काम करत आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेतील अनेक नेत्यांवर गेल्याकाही वर्षापासून ईडीची कारवाई होत आहे. तर ईडीच्या कारवाईमुळेच अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांना तुरूंगात जावं लागलं होतं. तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई होईल अशी चर्चा सुरू आहे.
राज्यात सध्या रस्त्यावरून आंदोलनं केली जात आहे. कोकणात जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून मनसेकडून जागर पदयात्रा केली जात आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून आणि पडलेल्या खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झाली आहे. तर यावेळी सरकारला जाग आणण्यासाठी मनसेकडून जागर यात्रा काढण्यात आली आहे. ही जागर यात्रा अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे गेल्या १७ वर्षापासून काम रखडलेलं आहे. त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे. तर याच महामार्गावरून मनसे आणि भाजपमध्ये कलगितूरा रंगलेला असतानाच आता मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात जागर यात्रा निघणार आहे.
हिंगोलीच्या रामलीला मैदानावर उद्धव ठाकरे यांची 27 ला सभा होणार आहे. मात्र त्याच्याआधी शिंदे गटाचे नेते तथा आमदार संतोष बांगर यांनी त्यांच्यावर निशाना साधला आहे
आगामी लोकसभा आणि विधानसेभेच्या पार्श्वभूमिवर शिवसेना शिंदे गटास चांगले दिवस आले आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेत माजी आमदारांसह आजी माजी नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते प्रवेश करत असतात. आताही ठाकरे गटासह काँग्रेसला मुंबईत गळती लागली आहे.
राष्ट्रवादीच्या फूटीनंतर शरद पवार हे बंडखोऱ्यांच्या जिल्ह्यात जाऊन सभा घेत आहेत. तर त्यांच्याबरोबर त्यांच्या गटाचे नेते देखील या सभांना हजेरी लावतात. साताऱ्यात ही शरद पवार यांची काल सभा झाली. ज्यात रोहित पवार यांनी जोरदार टीका केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तर पार पडलेल्या सभेत त्यांनी जोरदार टोलेबाजी केली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता नवे-जुने चेहरे समोर येत आहेत. तर अनेकांच्या नावापुढे आता भावी खासदार-आमदार लागताना दिसत आहे. सोलापुरातही एका राजकीय नेत्याच्या नावापुढे भावी खासदार लागल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
राज्यभर सध्या राजकीय पक्षांचे दौरे आणि सभा होत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभंच्या निवडणुका लक्षात घेऊन सर्वच पक्ष हे जनतेपर्यंत जात आहेत.