चेतन पाटील ‘टीव्ही 9 मराठी’ डिजीटल येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना माय महानगर, टीव्ही 9 मराठी, न्यूज 18 लोकमत या वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. त्यांचा क्राईम, राजकीय आणि अन्य विषयांच्या बातम्यांमध्ये हातखंडा आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दिग्गांचा पक्षप्रवेश होणार आहे. यामध्ये बॉलिवूडचा अभिनेता गोविंदा, अभिनेत्री करिना कपूर आणि करिष्मा कपूर यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच काँग्रेसचा आणखी एक बडा नेता देखील मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांना हात, पाय आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. दिलीप वळसे पाटलांवर पुण्यातील औध येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर 12 ते 15 दिवस रुग्णालयात उपचार सुरु रहातील असा अंदाज वर्तवण्यात येतोय.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'टीव्ही9 मराठी'ला 'रोखठोक' या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. 'टीव्ही9 मराठी'चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे नितीन गडकरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वाद आहेत का? किंवा नितीन गडकरींना खरंच भाजप पक्षात साईडलाईन केलं जातंय का? या प्रश्नांवर स्वत: गडकरी यांनी सविस्तर उत्तर दिलं.
भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांचा आता लवकरच भाजपात पक्षप्रवेश होणार आहे.
महाविकास आघाडीत जागावाटपावरुन जो वाद सुरु होता तो चव्हाट्यावर आल्याने शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद व्हायला हवी होती. त्यामध्ये सर्व उमेदवारांची एकत्रितपणे घोषणा व्हायला हवी होती. तसेच चर्चा सुरु असताना उमेदवारांची घोषणा व्हायला नको होती, असं मत शरद पवारांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
भाजपकडून आज अखेर खासदार नवनीत राणा यांना पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं. पण त्यांच्या उमेदवारीला आमदार बच्चू कडू यांनी विरोध केला आहे. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव कसा होईल, यासाठी आपल्याकडून प्रयत्न केला जाईल, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना अमरावतीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण नवनीत राणा यांना अमरातीच्या महायुतीमधीलच स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. आमदार बच्चू कडू आणि शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून विरोध आहे. विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार करु, असं जाहीर केलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अजून पहिल्या टप्प्यातीलदेखील मतदान अद्याप पार पडलेलं नाही. आताशी जागावाटप ठरत आहे. जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यावर येत असताना महाविकास आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे. कारण ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमदेवारांच्या यादीवर काँग्रेसकडून विरोध केला जातोय. हा विरोध आता खोचक शब्दांमधून केला जाताना दिसतोय.
खासदार उदयनराजे भोसले आज दिल्लीतून साताऱ्यात परतले आहेत. उदयनराजे दिल्लीतून पक्षश्रेष्ठींकडून आपल्या लोकसभा उमेदवारीचं तिकीट पक्क करुनच परतले आहेत. सातारा लोकसभेचं तिकीट आपल्यालाच मिळेल, अशी उदयनराजे यांना खात्री आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून आज उदयनराजेंचं साताऱ्यात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी उदयनराजेंना अमित शाह यांच्या भेटीसाठी तीन दिवस ताटकळत का राहावं लागलं? या प्रश्नाचं उत्तर उदयनराजे यांनी स्वत: दिलं.
राजकारणात कधी काय होईल? याचा काहीच भरोसा नाही. त्यामुळे भाजपमधला सोलापुरातला मोठा नेता उद्या शरद पवार गटाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवताना दिसला तर जास्त आश्चर्य वाटणार नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. विशेष म्हणजे अमोल कोल्हे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भेटीमुळे या चर्चांना जास्त गती मिळताना दिसत आहे. आता या घडामोडी पाहता भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.