काहीच दिवसात बच्चू कडू सूरतला पोहोचले.. ज्यावेळी आमदार सूरतला जात होते...त्याचवेळी दीपक केसरकर, संजय राठोड, दादा भुसे आणि गुलाबराव पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंशी वाटाघाटी करत होते.
आपलं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न झाला असून, क्लीनचिटची कागदपत्र चित्रा ताईंना पाठवणार असल्याचंही राठोड म्हणालेत. पुणे पोलिसांनी संजय राठोडांना जी क्लीन चिट दिली, त्यावरच चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतलाय.
2019 मध्ये नितीश कुमारांची जेडीयू, भाजप आणि रामविलास पासवान यांची एलजेपी एकत्र लढले होते, त्यावेळी मोदी लाटेत NDAला 40 पैकी तब्बल 39 जागांवर विजय मिळाला. त्या 39 जागांमध्ये भाजपचे 17 खासदार, जेडीयूचे 16 तर एलजेपीचे 6 खासदार निवडून आले.
शरद पवारांनीही भाजपवर शिवसेनेला हळूहळू संपवल्याचा आरोप केला. सुशील कुमारांच्या वक्तव्यानंतर, महाराष्ट्रातले भाजपचे नेते बॅकफूटवर गेलेले नाहीत..स्वत: फडणवीस असो की आशिष शेलार, यांनी उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवलंय.
सस्पेन्स वाढला तो या मंत्र्यांच्या खाते वाटपाचा, लवकरच खातेवाटप जाहीर होईल म्हणता म्हणता आता खाते वाटपबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आले, या नव्या मंत्र्यांचे खाते वाटप आता लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिलीय.
अनेक मोठ्या घडामोडी घडल्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
दुसरीकडे बंजारा समाजाने थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत चित्र वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, असेही आवाहन त्यांनी केलंय.
सुनिधी चव्हाणचा हा कार्यक्रम मुंबईत तसेच देशात कुठेही होऊ नये. यासाठी शिवसेनेचा विरोध असेल अशी ठाम भूमिका शिव वाहतूक सेना कार्यकारी प्रमुख गफ्फार शेख यांनी मांडली आहे आणि त्यांनी तशी तक्रार पोलिसात दाखल केली आहे.
त्यांना असे वाटते की काळे कपडे परिधान केल्याने त्यांचा निराशेचा काळ संपेल, परंतु त्यांना हे माहित नाही की त्यांनी कितीही फुशारकी मारली, कितीही काळी जादू केली तरी जनतेचा विश्वास त्यांच्यावर पुन्हा कधीही निर्माण होणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी राहुल गांधी यांच्यावर चढवला.
मला पोलिसांनी क्लीन चिट दिल्यानंतरच मी मंत्री झालो आहे. या प्रकरणात यापुढे कोणी काही माझ्यावरती आरोप करेल, तर त्याबाबत कायदेशीर पाऊल उचलले, असा थेट इशारा त्यांनी टीकाकारांना दिलाय.