आम्ही राष्ट्रवाद नाही तर राष्ट्रीयतेचा विचार करतो. विभिन्नतेत एकता आहे. जो हिॅदू नाही तो म्हणतो आमचं खरं बाकीचं सगळं चुकीचं आहे. भारत विविधतेला मानतो. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध सामाजिक प्रश्नांवर मोहन भागवत यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांना आरक्षणाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली.
आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष उडण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होऊ लागली आहे. त्याला ओबीसी समाजातून तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे आरक्षणाचा संघर्ष अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठा समाजाच्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यायला हवेत. तशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
घरातील सदस्याचा मृत्यू झाला. यामुळे घरचे सर्वजण मृतदेह घेऊन गावी चालले होते. याचा गैरफायदा घेत शववाहिका चालकानेच जे केलं ते पाहून पोलीसही हैराण झाले.
सायरस पुनावाला यांनी शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. सायरस पूनावाला काय बोलले यापेक्षा शरद पवार यांचा तो निर्णय आहे. ते वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यावर मी काही बोलणं योग्य नाही.
लोकसभा निवडणुकीला अवघं एक वर्ष बाकी असतानाच नक्षलवाद्यांचा मोठा प्लान उघडकीस आला आहे. नक्षलवाद्यांनी थेट पाच शहरांना टार्गेट करण्याचा कट रचला आहे. त्यामुळे निवडणुकांना गालबोट लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. वकिलामार्फत ही नोटीस बजावण्यात येणार आहे.
सना खान प्रकरणात निपक्ष चौकशी व्हावी. सना खानचा वापर अनेक दृष्टीने अनेकांनी केला आहे. आता तपासात पोलीस दिशा भरकवटण्याचं काम सुरु आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
कोणते लोकसभा क्षेत्र कुणी लढवायचे, कोण उमेदवार, हा संपूर्ण निर्णय पार्लमेंटरी बोर्डाकडे असते. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र भाजपकडे आहे. या लोकसभेचा प्रश्नच येत नाही, असं बावनकुळे म्हणाले.