मराठ्यांना ओबीसी वर्गात कसं टाकता येईल, असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला. त्यावेळी मराठ्यांच्या वंशावळी काय होत्या हे पाहावं लागेल. कुणीही मागणी केली आणि तसं होईल, असं काही नाही. महाराष्ट्राला शांतता आणि स्थिरता हवी आहे, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.