युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा आज केलीय. आपण लवकरच अयोध्येत दर्शनासाठी जाणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
"कुमार आदित्यजी ठाकरे (Aaditya Thackeray), आम्ही राजसाहेबांचे मनसैनिक…जनतेशी निष्ठा संपलेल्या पक्षाला आम्ही किंमत देत नाही.आणि तुमच्यासारखे भ्रष्टवादी पक्षांबरोबर सत्तेसाठी भाव करत नाही" असं ट्विट अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी केलं आहे. आदित्य ठाकरेंनी परवा संपलेल्या पक्षांवरती मी वक्तव्य करीत नाही असं म्हटलं होतं.
शनिवारी फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला. तर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी कोल्हापूरच्या जनतेला संबोधित करताना भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर काही वेळातच खासदार अरविंद सावंत यांनीही भाजपवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार प्रहार केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून दिलेला हिंदुत्वाचा नारा, त्यानंतर केंद्रीय मंत्री परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अचानक त्यांची भेट घेणं. गडकरींपाठोपाठ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.
22 एप्रिलपर्यंत जे कर्मचारी कामावर येतील त्यांच्यावर कारवाई करू नका, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना पीएफ, ग्रॅज्युएटी, पेन्शन द्यावी असेही म्हटले आहे. या निर्णावर गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
MSRTC Strike: एसटी कामगारांना येत्या 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहे. जे कामगार कोर्टाने दिलेल्या मुदतीत कामावर आले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा तुम्हाला मार्ग मोकळा आहे, असं कोर्टाने आम्हाला सांगितलं आहे.
किरीट सोमय्या यांच्याविरोधात मराठवाड्यात शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. औरंगाबादमध्ये क्रांती चौकात शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली. तर नांदेडमध्येही किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. परभणीतदेखील किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
चर्चेदरम्यान गृहखात्याला अधिक सक्षम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील उत्तम काम करत असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केलीय.
महाराष्ट्र (Maharashtra) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 2024 मध्ये काँग्रेसचं सरकार येईल अशी आशा व्यक्त केलीय.
या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दोन भाषणं केली. पहिलं भाषण शॉर्ट होतं. तर आजचं भाषण शिवाजी पार्कवरचं भाषण होतं, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली.