आजपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 ते 8 मार्चपर्यंत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आवक वाढल्याने दरात चांगलीच घसरण झाली होती. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आला असला तरी देखील अपेक्षित भाव मिळाला नाही आहे. कापसाला सध्या ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० पर्यंतच्या भाव मिळत आहे.
यावर्षी पपईला चांगले तर मिळत आहेत. पुढच्या वर्षी पपईच्या क्षेत्रांमध्ये अजून वाढ होईल, असा अंदाज पपई केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली आहे.
दोन बिबटे असल्याने आपसांत झुंज झाली. त्यात एका बिबट्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर हा भाग आहे. हद्द एकमेकांची असल्यामुळं पिंजरा लावून पकडण्यासाठी निर्बंध असतात.
महागाईविरोधातील आंदोलनात सत्यजित तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले होते. ज्या उमेदवाराला देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या नेत्याचा सन्मान करता येत नाही, त्याला भाजपने पाठिंबा देऊ नये.
सारंगखेडा घोडेबाजारात दाखल झालेल्या महागड्या घोड्यांची विक्री हे मालक करत नसतात. अश्वप्रदर्शनासाठी हे घोडे सारंगखेडा येथे दाखल होतात.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद सुरू असून वाद वैयक्तिक पातळीवर गेले आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी संयम ठेवावा.
Gulabrao Patil : मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर 50 खोक्याप्रकरणात जोरदार हल्लाबोल केला..
टोमॅटो वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात! अपघातापेक्षाही लोकांची कृती का ठरली असंवेदनशील?
एकाच दिवसात सहा लाख 97 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटी रुपये जमा झालेत.