राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जास्त दिवस राहणार नसल्याचा दावा केला आहे. तुम्ही तारीख आणि वेळ लिहून ठेवा, या सरकारचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे, असा दावा मिटकरी यांनी केला आहे.
सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकून पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
वांगणी गावात 1826 सालापासून रामनवमी उत्सव साजरा होतोय. या उत्सवाचं यंदा तब्बल 197 वावं वर्ष आहे. वांगणी गावात हिंदू आणि मुस्लिम धर्मीय अनेक वर्षांपासून एकोप्याने राहतायत.
अंबरनाथचे ठाकरे गटाचे शहरप्रमुख श्रीनिवास वाल्मिकी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली.
मला राऊत साहेबांची खूप काळजी वाटते. त्यांच्याबद्दल मला खूप सहानुभूती आहे. रोज सकाळी उठून कुणावरही ते आरोप करतात. मी एक डॉक्टर आहे. त्यामुळे त्यांच्या वागणुकीकडे पाहून मला वाटतं की, सिझोफ्रेनिया सारखा आजार त्यांना होतोय का?
मनुस्मृती हे चातुर्वण्य व्यवस्थेची समर्थन करणारी आहे. आणि मनुस्मृतीची विचारसरणी ही आपल्या माता भगिनींसाठी घातक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या ठाण्यातील पक्षाच्या शाखा बळकावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ठाणे महापालिकेबद्दल खळबळजनक दावा केलाय. "ठाणे महापालिकेच्या प्रत्येक मजल्यावर गँगस्टर उभे असतात, अधिकारी त्यांना एक-एक, दोन-दोन लाख रुपये देतात', असा दावा त्यांनी केला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायी गहाण ठेवलेला आपला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनी सोडवला असून याचा कार्यकर्त्यांना आनंद असल्याचेही आपण हा बॅनर लावल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
उल्हासनगरच्या उल्हासनदीचा रंगच बदलला आहे. नदीचा रंग गढूळ करणारे हे कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. उल्हासनदीचं पाणी अतिशय गढूळ दिसतंय.