कमी वयात नगरसेवक, महापौर, आमदार आणि मुख्यमंत्री झाले. राज्यातील जनतेच्या मनात उत्सुकता आहे की कोण हा तरुण, त्यामुळे हे 'मनोगत' असल्याचं पाटील म्हणाले.
मेट्रो - 3 हा देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी निर्णय आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्यात आला आणि कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. आता शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने पुन्हा एकदा मेट्रो कारशेड प्रकल्प आरेमध्येच पुर्णत्वास नेण्याचा निर्णय घेतलाय.
19 तारखेला भाजपचे केवळ चार मंत्र्यांचाच शपथविधी होईल. तसंच शिंदे गटातीलही केवळ चारच मंत्री शपथ घेतील अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. भाजपकडून चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील हे 19 तारखेला शपथ घेऊ शकतात, असं सांगण्यात येत आहे.
उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना पुढे काय पावलं उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
सरकार बदलल्याने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग आता सुसाट होणार असल्याची माहिती ही विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. फडणवीसांनी सत्तेत येताच ठाकरेंचा आक्षेप असणाऱ्या आणखी एका प्रकल्पाला गती देण्यासाठी पुन्हा कंबर कसली आहे.
नव्या सरकारने चांगल्या रितीने काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यांच्या त्यागाचा भाजपाला अभिमान आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केला.
आज फडणवीसांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर लगेचच फडणवीस यांनी कामकाजालाही सुरुवात केलीय. सचिवांच्या बैठका घेतल्या. तसंच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही एक बैठक घेत त्यांनी पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
Maharashtra Assembly Special Session News :2 आणि 3 जुलैऐवजी आता 3 आणि 4 जुलै रोजी म्हणजेच येत्या रविवारी आणि सोमवारी विधानसभेचं विशेष अधिवेशन पार पडेल.
कोर्टाच्या निर्णयानंतर, राज्यात आणि विधिमंडळात होणाऱ्या परिस्थीतीचा अंदाज घेण्यात आला. याबाबतकची भूमिका भाजपा ठरवेल, यावर चर्चेतून निष्पन्न करण्यात आलं. सध्या वेट अंड वॉच भूमिका असल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.
झिरवळ यांनी याबाबत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना नोटीस पाठवून उत्तर देण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिलाय. सोमवारी हा वेळ संपतोय. अशावेळी शिंदे गटाकडून संभाव्य कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.