इम्तियाज जलील यांनी आधी औरंगाबाद आणि आता सोलापूरमधून चलो मुंबईचा नारा दिलाय. सोलापूरमध्ये आज ओवेसी यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजाचा मेळावा पार पडला. त्यावेळी ओवेसी यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसंच मुस्लिम समाजातील बांधवांना शिक्षणांचं महत्वही पटवून दिलं.