पत्रकारिता क्षेत्रातील एकूण 7 वर्षांचा अनुभव. तरुण भारत (बेळगाव), झी 24 तास, एबीपी माझा या संस्थांमध्ये काम. राजकीय, शिक्षण, कृषी क्षेत्रातील बातमीदारीकडे कल. वाचन, लेखन आणि भटकंतीची आवड.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे चलनविषयक धोरण उद्या (बुधवारी) सादर करणार आहेत. सोमवारपासून रिझर्व्ह बँकेच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेपो किंवा रिव्हर्स रेपो स्थिर राहणार की बदलणार याकडे अर्थजगताच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सावधगिरीचा पवित्रा धारण केला आहे.
'संतांचा स्वभाव असतो सुक्ष्म लोकांचं गुणगाण गाऊन मोठं करणं. मी आज चेतना आणि उत्साह घेऊन पुढे जाणार आहे. ज्यांच्यात संवेदना असते धर्म आणि समाजासाठी काही करायची तळमळ असते, इच्छा असते अशा लोकांना काम करण्याची चेतना आणि उत्साह जीयरास्वामी देत आहेत. तुम्ही रामानुजाचार्यांच्या स्मारकातून हीच प्रेरणा मिळेल', असंही शाह यावेळी म्हणाले.
पुण्यातील हल्ल्याचे सर्व पुरावे समोर असतानाही, कारवाई होत नाही. त्यामुळे भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार, असं पाटील म्हणाले. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्व पुरावे देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
देशातील जनता अडचणीत असताना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लोकांची मदत करत होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र देशाची संपत्ती विकत होते. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही ते स्वतःला देशाचे पंतप्रधान नाही तर भाजपचे प्रचारक समजतात', अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेसच्या डीएनएमध्येच फुटीरतावादी मानसिकता आहे. तमिळ समाजाची भावना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. इंग्रज निघून गेले पण फोडा आणि राज्य कराची मानसिकता काँग्रेसनं टिकवून ठेवली. काँग्रेस ही टुकडे-टुकडे गँगची लीडर आहे, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी आज लोकसभेत केलाय.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या ओपिनियन पोलमध्ये 6 हजार लोकांना सर्व्हे सॅम्पलम्हणून सहभागी करण्यात आलं होतं. या पोलचा मार्जिर ऑफ एरर 3 टक्के आहे. तर हा पोल 95 टक्के विश्वासार्ह ठरेल असा अंदाज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करुन केली. 'देशानं आदरणीय लता दीदीला गमावलं आहे. एवढा मोठा काळ ज्यांच्या आवाजाने देशाला मोहित केलं, देशाला प्रेरित केलं, देशाला भावनांनी भरलं. मी आज आदरणीय लतादीदींना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो', असं मोदी म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी कोरोना संकटाच्या काळात पहिल्या लाटेवेळी कामगारांच्या स्थलांतरावरुन महाराष्ट्र, दिल्ली सरकार आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
यात तो दुवा मागतोय तर त्याच्यासोबत पांढऱ्या सदऱ्यात एक महिला आहे जी त्याची बायको गौरी खान म्हणून व्हायरल झालीय. ती मात्र हिंदू धर्माप्रमाणे हात जोडून अंत्यदर्शन घेतेय. लोकांनी हा फोटो 'आयडीया ऑफ इंडिया' म्हणून प्रसारीत केलाय. पण हे मात्र त्या फोटोचं वास्तव नाही.
रामानुजाचार्य यांचं ज्ञान जगासाठी मार्गदर्शक ठरावं, अशी अपेक्षा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. रामानुजाचार्य यांच्या विशाल मूर्तीच्या रुपाने भारत मानव ऊर्जा आणि प्रेरणांना मूर्त रुप देत आहे. रामानुजाचार्य यांची ही प्रतिमा त्यांचं ज्ञान, वैराग्य आणि आदर्शांचं प्रतिक आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
महापालिका परिसरात काही शिवसैनिकांनी सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच त्यांना रोखण्याचा, अंगावर धावून जाण्याचा प्रकरण करण्यात आला. या गंभीर प्रकाराचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फोन करुन फडणवीसांनी घडलेल्या प्रकाराची आणि सोमय्या यांच्या प्रकृतीबाबत विचारपूसही केलीय.