पत्रकारिता क्षेत्रातील एकूण 7 वर्षांचा अनुभव. तरुण भारत (बेळगाव), झी 24 तास, एबीपी माझा या संस्थांमध्ये काम. राजकीय, शिक्षण, कृषी क्षेत्रातील बातमीदारीकडे कल. वाचन, लेखन आणि भटकंतीची आवड.
प्रचार संपण्यापूर्वी हरीश रावत यांनी भाजपवर तीखट शब्दात हल्ला चढवला होता. 'भाजपनं केलेल्या सर्व आश्वासनांवर उत्तराखंडीयत हावी होती. त्यामुळेच पंतप्रधान मोदींना एवढी वर्षे ज्या टोपीची आठवणही आली नाही. त्यांना ती टोपी उत्तराखंडमध्ये जाऊन घालावी लागली. उत्तराखंडमध्ये जनता विरुद्ध भाजप असं मतदान होत आहे,' अशी टीका रावत यांनी केली.
शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यासाठी काठ्यांची पूजाही केली आहे! 'भारतीय संस्कृती के सम्मान में, शिवसेना मैदान में' अशी घोषणाबाजी करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हातातील काठ्याही दाखवल्या आहेत. इतकंच नाही तर "पार्क में कुछ करते दिखे बाबू-सोना, तो तोड देंगे शरीर का कोना-कोना", अशा घोषणाबाजीतून त्यांनी पेमीयुगुलांना थेट इशाराच दिलाय.
दिल्ली कॅपिटल्सने सर्वाधिक खेळाडूंची खरेदी केली तर मुंबई इंडियन्सने सर्वात कमी खेळाडू विकत घेतले. सर्वच संघांनी आपल्या प्लॅनिंगनुसार खेळाडूंवर बोली लावली. त्यात काही संघांना यश मिळालं तर काही संघांना माघार घ्यावी लागली. पहिल्या दिवशीच्या लिलावानंतर संघांची स्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
निवडणूक आयोगाकडून देशभरातील आणि खास करुन निवडणूक होत असलेल्या राज्यांमधील कोरोना स्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात आला. तसंच आयोगाने कोरोना स्थितीबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठीकीनंतर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना प्रचाराबाबत मुभा दिली आहे.
एबीजी शिपयार्डच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (CBI) गुन्हा दाखल केला आहे. तब्बल 22 हजार कोटी रुपयांचा आर्थिक फेरफार झाल्याचा ठपका सीबीआयनं ठेवला आहे.
कार्यक्रमावेळी निवेदकाने 'हर खदान मे हिरा मिल नही सकता, हर बाग मे फुल खिल नही सकता; युं तो धन दौलत मिल जाती है सभी को, किंतू हमारे उद्धव ठाकरेजी जैसा दुसरा व्यक्तीमत्व संसार मे हो नकी सकता', अशा शायरीतून मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीही या शायरीला दाद दिली आणि सलमान, सोनाक्षीच्या चित्रपटातील एक डायलॉग सांगितला.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाची औद्योगिक उभारणी करण्यात काही लोकांचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यात महत्वाची नावं आहेत. जेआरडी टाटा, किर्लोस्कर यांनी देशाची औद्योगिक पायाभरणी केली. त्यांच्यानंतर दुसऱ्या फळीत राहुल बजाज यांचं मोठं योगदान आहे. हे कुटुंब मूळ वर्ध्याचं आहे. ते गांधी विचारांचे आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय हा कापसाचा होता. नंतरच्या पिढीने एका वेगळ्या दृष्टीने पुढे जायचा विचार केला, असं शरद पवार यांनी सांगितलं.
सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असा पुनरुच्चार चंद्रकांत पाटील यांनी केलाय.
इमारत कोसळून झालेल्या नुकसानीची भरपाई कशी करता येईल, असा प्रश्न अनेकांना सतावतो . नुकसानीच्या भरपाईसाठी कोणता विमा उपलब्ध आहे आणि त्याचे नियम काय आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
iPhone 12 Mini वर थेट डिस्काउंट ऑफर करण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर आयफोनसाठी खास ऑफर उपलब्ध आहे.