भाजपकडून दोन्ही विजयाचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलं. मात्र, पक्षाची मतं फुटल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. चव्हाण यांनी या पराभवावरुन आज पक्षाला घरचा आहेर दिलाय.
टेंभी नाका परिसरात शिंदे गटाची दहीहंडी साजरी होत असली तरी याठिकाणी भाजपाच्या नेत्यांचे भले मोठे पोस्टर्स लागलेले पाहायला मिळत आहेत. या माध्यमातून राजकीय शक्तीप्रदर्शन केले जात आहे.
अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. राज्यात तब्बल 15 लाख हेक्टरावरील पिके ही बाधित झाली आहे. शेतकऱ्यांचे हीत पाहता यापूर्वीच मुख्यमंत्री यांनी गतवर्षीपेक्षा दुपटीने मदत आणि 2 नव्हे तर 3 हेक्टरापर्यंत नुकसान झाले तरी भरपाई असे निर्णय घेतले आहेत. नुकासनीचा आढावा कृषी विभागाकडून मिळाला असून तो आता मुख्यमंत्र्यांकडे सपूर्द केला जाणार आहे.
विविध जिल्ह्यांतील कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेद्वारे खासगी कंत्राटदारांमार्फत डबे पुरवले जातात. मात्र हिंगोलीत कंत्राटदारांकडून योग्य दर्जाचे जेवण दिले जात नसल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला.
रझा अकादमीचे सईद नुरी यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवत आमच्यात फक्त अल्लाहची पूजा करतात. म्हणून त्याऐवजी सरकारने काही दुसरा पर्याय द्यावा जो सर्वाना मान्य असेल. याबाबत आम्ही उलेमा आणि इतर संबंधितांशी चर्चा करून सरकारला पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. रझा अकादमीच्या आक्षेपाला आता मुनगंटीवार यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
Ashish Shelar : आताची जी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहे, त्यांचंही तेच मत आहे. घराणेशाही नको आणि बरोबरीने सर्वांना उत्तम स्थान मिळावं ही त्यांची भूमिका आहे. लोकशाहीमध्ये भ्रष्टाचाराला स्थान नसावं, असं त्यांचं मत आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर (Kiran Pavaskar) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. 'स्वत:च्या गालावर बसलेला मच्छर उडवणारा नाही तर सक्षम हाताचा मुख्यमंत्री हवा', अशी खोचक टीका पावसकर यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केलीय.
पंकजा मुंडे ह्या एक मास लिडर आहेत. शिवाय त्यांची कार्यकर्ते आणि जनतेमध्ये एक वेगळी छबी आहे. प्रत्येक वेळी मंत्रिपदाबाबत त्यांना डावलले जात असल्याचे सबंध महाराष्ट्र पाहत आहे. पण त्यांच्यामध्ये स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराचा वारसा असतानाही असे का असा सवाल सचिन अहिर यांनी उपस्थित केला आहे.
चंद्रकांत पाटील हे देखील मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपकडून त्यांना फोन गेलाय आणि त्यांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ आता आमदार आशिष शेलार यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
TET Scam : मला पृथ्वीराज बाबांबद्दल बोलायचं नाही. मी आधीच क्लिरिफिकेशन दिलं आहे. या घोटाळ्याबाबत कुणाला माहीत नव्हतं. व्हॉट्सअपवर यादी आली. कालच माझ्याकडे यादी आली होती. त्यावर मी तात्काळ उत्तर दिलं. कोणी तरी फेक न्यूज चालवत असल्याचं सांगितलं.