मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेऊन राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. तसेच निवडणुकीत कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे, याची माहितीही दिली आहे. देशात नव मतदार आणि महिला मतदारांची संख्या वाढल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच निवडणुकीत गडबड करणाऱ्यांची खैर राहणार नाही, असंही त्यांनी निक्षून सांगितलं.