आता पर्यंत दुष्काळामुळे जी परस्थिती या व्यवसयावर ओढावली नव्हती ती वेळ कोरोनामुळे आली आहे. कारण जिल्ह्यातील त-हाडी, वरूळ, भटाणे, जवखेडा, त-हाड कसबे येथील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती मात्र, त्याला जोड होती दूग्ध व्यवसायची. वाढत्या उत्पादनामुळे या भागातील शेतकरी धवलक्रांती कडे पाहत होते. परंतु दुष्काळ अन् कोरोनाचे ग्रहन लागल्याने त-हाडी परिसरातील शेतकऱ्यांची ही धवलक्रांती संपूर्णतः धोक्यात आली आहे.