पोहरादेवी येथील सर्वच पिठाच्या विकासकामाला निधी दिला असल्याचं संजय राठोड यांनी सांगितले आहे. त्यानंतर मंत्री संजय राठोड यांनी साऱ्यांना रामनवमीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
राम नवमीनिमित्त राज्यभरातील महत्त्वाच्या देवस्थानंमध्ये आज गर्दी पाहायला मिळत आहे. यातच तेलंगणामधील हजारो भाविक पालखीसोबत अकरा दिवस पायदळ चालत आले.
गारपीट झाल्याने पिकांची नासाडी झाली. यात सापडला तो वाशिम येथील एक कलिंगड उत्पादक शेतकरी. त्यांनी दोन एकर जागेत कलिंगड लागवड केली होती.
जिल्हा परिषदेची ही शाळा गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबवतात. शिक्षकांच्या सहकार्यामुळे विद्यार्थी हे काम करू शकतात. पर्यावरणाचं जतन यातून होते.
मंगरूळपीर तालुक्यातील रुई परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. वनोजा परिसरात वादळी वाऱ्यावरसह हलक्या स्वरूपाची गारपीट झाली. यामध्ये वनोजा येथील शेतकरी यांच्या लिंबू फळबागेचे नुकसान झाले.
जैनांची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूरची ओळख. इथं जैन धर्मियांचे 24 वे तिर्थनकार भगवान पार्श्वनाथ यांचे मंदिर आहे. या मंदिराचा वाद या दोन पंथामध्ये आहे.
अकोला लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 1975 ते 77 दरम्यान कार्यभार पाहिला. १९७६ ते ७७ या कालावधीमध्ये अकोला जिल्हा खादी बोर्डाचे अध्यक्ष होते. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली.
वाशिममधील एका जिल्हा परिषद शिक्षकानं गणित सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी प्रयोग केले. ते त्यात यशस्वी झाले. आता त्यांच्या या प्रयोगाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे.
जागीच दोघांचा जीव गेला. इतर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. ऑटोने पलटी मारली. यावरून अपघाताची भीषणता समजते.
सकाळी संपूर्ण गाव झोपेत असताना आग सर्वत्र पसरली. शेजारी असणारे दत्ता वानखेडे यांच्या सुद्धा म्हशीच्या गोठ्यालाही आग लागली. त्यांचेसुद्धा लाखाच्या वर नुकसान झाले.