फेस्टिव्ह सीजनमध्येही वाहन कंपन्यांना मोठा फटका, विक्रीत 24 टक्क्यांची घट

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लोक दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी करतील, असा अंदाज होता. परंतु ऑक्टोबर महिन्यात वाहन विक्रीत घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

फेस्टिव्ह सीजनमध्येही वाहन कंपन्यांना मोठा फटका, विक्रीत 24 टक्क्यांची घट
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 7:23 PM

मुंबई : कोरोना महामारी (Corona Pandemic) आणि लॉकडाऊनमुळे (lockdown) देशातील ऑटो इंडस्ट्रीला (Automotive industry) मोठा फटका बसला होता. अनलॉकची (Unlock) प्रक्रिया सुरु केल्यानंतर वाहनविक्री पुन्हा सुरु झाली. ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अनेक कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये (Auto sales october) त्यामध्ये आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींसह वाहन कंपन्यांनी व्यक्त केली होती, परंतु तसे झालेले दिसत नाही. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर (festive season) लोक दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी करतील, असा अंदाज होता. परंतु ऑक्टोबर महिन्यात वाहन विक्रीत घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

केवळ काही कंपन्यांच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत थोडीफार वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स आणि किया मोटर्स या कंपन्यांचा बाजारात बोलबाला पाहायला मिळाला. मात्र इतर कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनने (फाडा) दिलेल्या माहितीनुसार प्रवासी वाहनांच्या विक्रीत देशभरात 8.8 टक्क्यांची घट झाली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 2 लाख 73 हजार 980 प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. तर यंदा ऑक्टोबर महिन्यात 2 लाख 49 हजार 860 प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे.

दुचाकींच्या बाबतीतही फार चांगलं चित्र पाहायला मिळालेलं नाही. ऑक्टोबर महिन्यात यंदा 10 लाख 41 हजार 682 दुचाकींची विक्री झाली आहे, तर गेल्या वर्षी याच महिन्यात 14 लाख 23 हजार 394 बाईक्सची विक्री झाली होती. दुचाकीच्या विक्रीत तब्बल 26.82 टक्क्यांची घट झाली आहे.

कमर्शियल व्हेईकल्सना (व्यावसायिक वाहनं) सर्वात मोठा फटका बसला आहे. कमर्शियल व्हेईकल्सच्या विक्रीत तब्बल 30.32 टक्क्यांची घट झाली आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात 44 हजार 480 कमर्शियल व्हेईकल्सची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या सेगमेंटमध्ये तब्बल 63 हजार 837 युनिट्सची विक्री झाली होती.

एकंदरित सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीचा विचार केला असता, वाहनांच्या विक्रीत ऑक्टोबर महिन्यात 23.99 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 18 लाख 59 हजार 709 वाहनांची विक्री झाली होती. तर यंदा ऑक्टोबर महिन्यात 14 लाख 13 हजार 549 वाहनाची विक्री झाली आहे.

संबंधित बातम्या

दिवाळीत ‘या’ पाच बाईक्स खरेदी करा आणि मिळवा 43 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Mahindra ची खास स्कीम, कोणत्याही वाहनावर 11,500 रुपयांचा डिस्काऊंट

जुन्या गाडीच्या बदल्यात नवी गाडी घेऊन जा; सरकारकडून विशेष सूट

Hyundai ची All New i20 कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Big loss for auto companies, 24 percent decline in sales)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.