शेजाऱ्यांचं पाहून दोन भावांचा खारी विक्रीचा धंदा, मात्र व्यावसायिक वादातून एकाची निघृण हत्या

कल्याणच्या वालधूनी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे (bread seller murdered neighbour for start selling bread).

शेजाऱ्यांचं पाहून दोन भावांचा खारी विक्रीचा धंदा, मात्र व्यावसायिक वादातून एकाची निघृण हत्या
Follow us
| Updated on: Aug 24, 2020 | 8:22 PM

ठाणे : लॉकडाऊन काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेजाऱ्याला पाहून दोन भावंडांनी खारी-पाव विक्रीचा व्यवसाय सुरु केला. मात्र, आमचाच धंदा तुम्ही का सुरु केला? असा सवाल करत शेजारी राहणाऱ्या तीन जणांनी मिळून दोन भावांपैकी एकाची हत्या केली. कल्याणच्या वालधूनी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सल्लाउद्दीन अन्सारी, कशीमुद्दीन अन्सारी, मियाद अन्सारी या तिघांना अटक केली आहे (bread seller murdered neighbour for start selling bread).

कल्याणमधील वालधूनी परिसरात अमर कनोजिया यांचा लॉण्ड्रीचा व्यवसाय होता. या व्यवसायातूनच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. अमर यांचे भाऊ रोशनलाल हे रिक्षाचालक आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. लॉकडाऊन काळात लॉण्ड्री आणि रिक्षा हे दोन्ही व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले (bread seller murdered neighbour for start selling bread).

हेही वाचा : Mahad Building Collapse | अवघी 10 वर्षे जुनी इमारत, पत्त्याप्रमाणे कोसळली, नेमकं काय घडलं?

अमर कनोजिया यांच्याशेजारी सल्लाद्दीन अन्सारी यांचा खारी-पाव विक्रीचा व्यवसाय होता. लॉकडाऊन काळात अमर आणि रोशनलाल आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनीदेखील खारी-पाव विक्रीचा व्यवसाय सुरु केला. हे पाहून घराशेजारी राहणाऱ्या सल्लाउद्दीनला राग आला.

कोणतेही कारण शोधून सल्लाउद्दीन हा अमर आणि रोशनलाल यांच्यासोबत भांडण करायचा. मात्र, यावेळी त्याने त्याहीपुढे जाऊन रोशनलाल यांच्यावर हल्ला केला. यावेळी सल्लाउद्दीनचे दोन साथीदार सोबत होते. या मारहाणीदरम्यान रोशनलाल यांचा मृत्यू झाला. यावेळी रोशनलाल यांचे भाऊ अमरला यांनाही मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान, सल्लाउद्दीनला आणि त्याच्या साथीदारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी रोशनलाल यांची मोठी मुलगी शांती यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.