वाढदिवसाच्या दिवशीच धारधार शस्त्राने वार करत मित्राकडून मित्राची हत्या
घाटकोपरमध्ये मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (28 जुलै) मध्य रात्री साईबाबा गार्डन येथे घडली.
मुंबई : घाटकोपरमध्ये मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (28 जुलै) मध्य रात्री साईबाबा गार्डन येथे घडली. नितेश सावंत (32) असं मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. पंतनगर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली आहे.
घाटकोपरमधील नितेश सावंत याचा शनिवारी (27 जुलै) वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या मित्रांनी त्याला रविवारी रात्री उशिरा साईबाबा गार्डन येथे बोलवले. या दरम्यान त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनीची त्याच्यावर सपासप वार करत तेथून पळ काढला.
Mumbai: 27-year-old man killed by 7-8 people during his birthday celebrations last night in Ghatkopar. Police Inspector Pratap Bhosle says, “prima facie, the deceased had an altercation with some people 4 to 5 days ago, & he was killed in connection with that”. #Maharashtra pic.twitter.com/hrMPO44PNX
— ANI (@ANI) July 29, 2019
यानंतर घटनास्थळी पंतनगर पोलीस दाखल झाले आणि नितेशला जखमी अवस्थेत नजीकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
एका आठवड्यापूर्वी नितेश आणि त्याच्या मित्रांमध्ये वाद झाले होते. याच वादातून हा खून झाल्याची माहिती पंतनगर पोलिसांनी दिली आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून अधिक तपास करत आहे.