इचप्पा पवार हत्येचा निकाल लागला, 18 आरोपींना जन्मठेप
सोलापूर : महाराष्ट्रभर गाजलेल्या वैरागमधील इचप्पा पवार हत्या प्रकरणातील 18 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 26 एप्रिल 2014 रोजी वैराग येथील वीटभट्टीचे मालक इचप्पा विठ्ठल पवार यांची जमावाने धारदार शस्त्राने हत्या केली. व्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून ही हत्या करण्यात आली होती. बार्शी तालुक्यातील वैराग येथे इचप्पा पवार या वीटभट्टी मालकाचा 21 जणांच्या जमावाने तलवार, सळईने निघृणपणे […]
सोलापूर : महाराष्ट्रभर गाजलेल्या वैरागमधील इचप्पा पवार हत्या प्रकरणातील 18 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 26 एप्रिल 2014 रोजी वैराग येथील वीटभट्टीचे मालक इचप्पा विठ्ठल पवार यांची जमावाने धारदार शस्त्राने हत्या केली. व्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून ही हत्या करण्यात आली होती.
बार्शी तालुक्यातील वैराग येथे इचप्पा पवार या वीटभट्टी मालकाचा 21 जणांच्या जमावाने तलवार, सळईने निघृणपणे हत्या केली होती. हत्या करुन मारेकऱ्यांनी मृत पवार यांची मालमत्ता देखील जाळून टाकली होती. वीटभट्टीतील व्यवसायातून आणि पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादामुळे ही घटना घडली होती.
इचप्पा पवार यांचे मामा सिताराम दिंडोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजी पवार, सागर पवार, सोमनाथ देवकर यांच्यासह तब्बल 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास करुन 21 जणांविरोधात दाषारोपपत्र सादर केले होते. त्यानंतर आज जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला. यामध्ये 18 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर प्रत्येकी 10 हजार रुपये दंड आणि मयताच्या नातेवाईकांना एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.