नवी मुंबईत भंगाराच्या गोदामात झोपलेल्या तीन कामगारांची हत्या

तुर्भे एमआयडीसीतील भंगाराच्या गोदामात तीन कामगारांचा निघृण खून करण्यात आला. बोनसरी गावात ही थरारक घटना घडली. झोपेत असलेल्या कामगारांची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

नवी मुंबईत भंगाराच्या गोदामात झोपलेल्या तीन कामगारांची हत्या
Follow us
| Updated on: Jul 13, 2019 | 12:57 PM

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील भंगाराच्या गोदामात तीन कामगारांचा निघृण खून करण्यात आला. बोनसरी गावात ही थरारक घटना घडली. झोपेत असलेल्या कामगारांची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली. आर्थिक व्यवहारातून हे तिहेरी हत्याकांड झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावाजवळ अनधिकृतपणे चालत असलेल्या भंगाराच्या गोदामामध्ये हा प्रकार घडला.

झोपेच्यावेळीच हे हत्याकांड झालं असावं. या हत्येमागे चोरीऐवजी पैशांच्या देवाण-घेवाणीचा वाद असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

मारेकऱ्यांनी तीनही कामगारांच्या डोक्यात जड वस्तूने हल्ला केला, त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करुन ही हत्या केली.  या हत्येनंतर त्यांचे मृतदेह त्याच ठिकाणी लपवण्यात आले होते. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, तपास सुरु केला.

घटनास्थळी पोलिसांचं डॉग स्क्वॉड आणि फिंगर प्रिंट शोधणारी टीम दाखल झाली. मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांची विविध पथकं अनेकस्थळी रवाना झाली आहेत.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.