CBSE : ए ‘सीबीएसई’वालो जश्न मनाओ ! तुमची बोर्ड परीक्षा आता एकदाच होणार, निर्णय झालाय शिक्कामोर्तब बाकी !
कोरोनाच्या संकटामुळे सगळंच नियोजन विस्कळीत झालंय. या संकटाची शैक्षणिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर झळ बसलीये. या काळात शिक्षण क्षेत्रात नव्याने अनेक नियम बनवले गेले, परीक्षांसाठी नवीन नियोजनं केली गेली ती वारंवार मोडली गेली पुन्हा बनवली गेली.
नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) संकटामुळे सगळंच नियोजन (Planning) विस्कळीत झालंय. या संकटाची शैक्षणिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर झळ बसलीये. या काळात शिक्षण क्षेत्रात (Education Sector) नव्याने अनेक नियम बनवले गेले, परीक्षांसाठी नवीन नियोजनं केली गेली ती वारंवार मोडली गेली पुन्हा बनवली गेली. यातीलच एक नियोजन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचं 10वी 12वी साठीचं ‘टू टर्म एक्झाम’ नियोजन. कोरोना महामारीपूर्वी सीबीएसईने बोर्ड परीक्षांची दोन भागांमध्ये विभागणी केली होती. पहिल्या टर्मच्या परीक्षा डिसेंबर मध्ये घेण्यात आल्या आणि आता दुसऱ्या टर्मच्या 26 एप्रिलपासून सुरु होणार आहेत. पण आता हेच दोन टर्म एक्झामचं नियोजन पुढील वर्षांपासून रद्द करून एकदाच परीक्षा घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी ही खुशखबर आहे !
अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी
‘आता शाळा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याविषयी अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब करण्यात येईल.’, असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय . त्याचबरोबर सीबीएसईच्या अभ्यासक्रमाबाबत बोलायचं झालं तर सीबीएसईने गेल्या दोन वर्षात स्वीकारलेलं धोरणंच कायम राहणार आहे ज्यात अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी करण्यात आलाय.
निवेदनं शाळांकडून आल्यानंतर हा निर्णय
सीबीएसईने दोन टर्म परीक्षांचं स्वरूप कायम राहील असं कधीही जाहीर केलं नव्हतं असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर एकच परीक्षा पद्धत पुन्हा सुरु करण्याची निवेदनं शाळांकडून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलंय.
इतर बातम्या :