सुनील पाल प्रमाणे या बॉलिवूड अभिनेत्याचेही अपहरण, कार्यक्रमासाठी बोलवले आणि…

कॉमेडी कलाकार सुनील पाल यांच्या अपहरणाचं प्रकरण ताजं असताना आणखी एका चित्रपट अभिनेत्याचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेते मुस्ताक खान यांना एका कार्यक्रमाच्या नावाखाली बोलवून त्यांचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून टोळीचा शोध घेतला जात आहे.

सुनील पाल प्रमाणे या बॉलिवूड अभिनेत्याचेही अपहरण, कार्यक्रमासाठी बोलवले आणि...
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 8:50 PM

सुनील पाल अपहरण प्रकरण ताजं असतानाच आणखी एका बॉलिवूड कलाकाराचे अपहरण करुन त्याच्याकडून २ लाख रुपये उकळल्याचं प्रकरण समोर आले आहे. बिजनौरमध्ये एका कार्यक्रमासाठी बोलवून चित्रपट अभिनेते मुस्ताक खान यांचं अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडून तब्बल 2 लाख रुपये उकळल्याची माहिती समोर येत आहे. पैसे मिळत नाही तोपर्यंत त्यांना ओलीस ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी संधी मिळताच मुस्ताक खान तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी आता या घटनेचा तपास सुरू केला आहे.

मुस्ताक खान यांचे इव्हेंट मॅनेजर शिवम यादव यांच्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबरला मेरठमधील राहुल सैनी या व्यक्तीने मुस्ताक खान यांना एका कार्यक्रमात सहभागी होण्याचा फोन केला होता. त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुस्ताक खान हे 20 नोव्हेंबरला मुंबईहून दिल्लीला पोहोचले. तिथे एक कॅब आधीच त्यांची वाट बघत होती. पण दिल्ली विमानतळावरुन बाहेर आल्यानंतर लगेचच एका शिकंजी स्टॉलवर ती कॅब थांबवली. त्या कॅबमधून त्यांना उतरवण्यात आलं आणि दुसऱ्या वाहनात बसवलं. पुढे काही अंतर गेल्यानंतर आणखी दोन जण गाडीत येऊन बसले. यानंतर अपहरणकर्त्यांनी मुस्ताक यांना पकडून अज्ञातस्थळी नेले.

अज्ञात स्थळी नेल्यानंतर मुस्ताक खान यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. परंतु त्यांच्याकडे एटीएम नसल्याने अपहरणकर्त्यांनी त्यांच्या मोबाइल फोनवरून 2 लाख रुपये खात्यात ट्रान्सफर केले. अपहरणकर्त्यांनी पैसे मिळाल्यानंतर मद्यपानाची पार्टी केली. जेव्हा सकाळी ते मद्यधुंद अवस्थेत होते. त्याचा फायदा घेत मुस्ताक खान हे तेथून पळून एका मशिदीत पोहोचले आणि त्या ठिकाणी लोकांकडे मदत मागितली. यावेळी आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती मौलवींना दिली.

मुस्ताक खान यांनी त्यानंतर त्यांच्या ओळखीच्या लोकांना तेथे बोलवले. मशिदीच्या आसपासच्या लोकांनी त्यांना मुंबईला पाठवले. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी आपला इव्हेंट मॅनेजर आणि कुटुंबीय यांना घटलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर इव्हेंट मॅनेजर शिवम यादव याने पोलिसात तक्रार दाखल केली.

कोतवाली शहर पोलीस ठाण्यात BNS कलम 140 (2) नुसार अपहरण, ओलीस ठेवणे आणि खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. पोलीस सध्या या टोळीचा शोध घेत आहेत. सुनील पाल यांच्यासोबत घडलेल्या घटनेनंतर ही घटना समोर आली आहे.

जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.