केसरी : अक्षय कुमारचा अभिनय आणि सैनिकांच्या शौर्याला सलाम

केसरी हा रंग शौर्याचं प्रतिक मानला जातो. अक्षय कुमारच्या केसरी सिनेमात 36 शिख रेजिमेंट आणि 21 शिख सैनिकांचं शौर्य आणि त्यांचं बलिदान दाखवण्यात आलंय. 1897 मध्ये झालेल्या सारागढी लढाई मोठ्या लढायांपैकी एक मानली जाते. 21 शिख सैनिकांनी इंग्रजांचं राज्य आणि अफगाणी राज्यकर्त्यांचीही झोप उडवली होती. केसरीचे दिग्दर्शक अनुराग सिंह यांनी या सिनेमातून दिग्दर्शनाची सुरुवात केली […]

केसरी : अक्षय कुमारचा अभिनय आणि सैनिकांच्या शौर्याला सलाम
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

केसरी हा रंग शौर्याचं प्रतिक मानला जातो. अक्षय कुमारच्या केसरी सिनेमात 36 शिख रेजिमेंट आणि 21 शिख सैनिकांचं शौर्य आणि त्यांचं बलिदान दाखवण्यात आलंय. 1897 मध्ये झालेल्या सारागढी लढाई मोठ्या लढायांपैकी एक मानली जाते. 21 शिख सैनिकांनी इंग्रजांचं राज्य आणि अफगाणी राज्यकर्त्यांचीही झोप उडवली होती. केसरीचे दिग्दर्शक अनुराग सिंह यांनी या सिनेमातून दिग्दर्शनाची सुरुवात केली आहे. समीक्षकांकडूनही या सिनेमाला चांगलं रेटिंग देण्यात आलं आहे.

सिनेमाची कहाणी

19 व्या शतकातील ही कथा आहे, जेव्हा अफगाणिस्तानला कोणत्याही परिस्थितीत भारतीय भूमीवर स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं होतं. भारतावर तेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती. अफगाणी आणि ब्रिटशांमध्ये संघर्ष चालूच होता. सारागढी (सध्या पाकिस्तानातील खैबर पख्तुन्वा प्रांतात) मार्गे भारतावर आक्रमण करण्याची योजना अफगाणिस्तानने आखली. एकाच दिवसात सारागढी किल्ला, त्यानंतर गुलिस्तान किल्ला आणि शेवटी लोकहार्ट किल्ल्यावर स्वारी करण्याचं नियोजन होतं. पण गुलिस्तान किल्ल्यात तैनात असलेल्या 21 शिख सैनिकांनी अफगाणींवर मात केली. गुलिस्तान किल्ल्यातील हवालदार इशर सिंह (अक्षय कुमार) च्या नेतृत्वात अफगाणी सैन्याला कशा पद्धतीने धूळ चारली हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात जावं लागेल.

अभिनय

प्रत्येक भूमिकेला न्याय देणारा अभिनेता अशी अक्षय कुमारची ओळख आहे. पुन्हा एकदा अक्षय कुमारने स्वतःला सिद्ध करुन तर दाखवलंयच, पण प्रेक्षकांच्या मनात त्याच्याविषयी आदर आणखी वाढलाय यात शंका नाही. अक्षय कुमारचे डायलॉग, त्याची अक्शन हे ज्या पद्धतीने साकारलंय ते पाहून अंगावर शहारे येतात. अक्षय कुमारने या सिनेमात भूमिका साकारलेली नाही, तर भूमिका जगणं ज्याला म्हणतात, त्याचा प्रत्यय येतो. परिणीती चोप्राची भूमिका अत्यंत कमी आहे. इतर कलाकारांनीही अक्षय कुमारसोबत मिळून दमदार अभिनय केलाय.

का पाहावा?

विविध कारणांमुळे तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. सिनेमाची कथा ही सर्वात मोठी ताकद आहे. सिनेमा तुम्हाला इतिहासात घेऊन जातोच, शिवाय तुम्हाला भारतीय म्हणून गर्वही वाटतो. शिखांच्या शौर्यावर गर्व वाटेल असा हा सिनेमा आहे. तेरी मिट्टी हे गाणं इमोशनलही करतं. क्लायमॅक्स सीन पाहताना अंगावर अक्षरशः शहारे येतात. सिनेमा कुठेही भटकलेला नाही ही जमेची बाजू आहे. त्यामुळे प्रेक्षक सिनेमाला खिळून राहतात.

रेटिंग : 5/4

सिनेमाचा ट्रेलर पाहा

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.