Neha Kakkar | लग्न की फक्त लग्नाचा ‘ड्रामा’?, नव्या गाण्यानंतर नेहा कक्करचे चाहते बुचकळ्यात!

गाण्यात नेहाचे लग्न दाखवल्याने ती खरेच लग्न करतेय की केवळ गाण्यासाठी हा सगळा ड्रामा होता, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

Neha Kakkar | लग्न की फक्त लग्नाचा ‘ड्रामा’?, नव्या गाण्यानंतर नेहा कक्करचे चाहते बुचकळ्यात!
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 3:29 PM

मुंबई : गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) सध्या तिच्या लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसह ती लग्न बेडीत अडकणार असल्याचे म्हटले जाते आहे. लग्नाच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच नेहाचे नवे गाणे (New Song) प्रदर्शित झाले आहे. ‘नेहू दा व्याह’ असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्यात नेहासोबत गायक रोहनप्रीतही झळकला आहे. ‘नेहू दा व्याह’ या गाण्यात नेहा आणि रोहनप्रीतचे लग्न दाखवण्यात आले आहे. त्यामुळे तिचे चाहते आता पुन्हा एकदा बुचकळ्यात पडले आहेत. (Neha kakkars new song Nehu da vyah release today)

गाण्यात नेहाचे लग्न दाखवल्याने ती खरेच लग्न करतेय की केवळ गाण्यासाठी हा सगळा ड्रामा होता, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. या गाण्याला तिच्या चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नेहा आणि रोहनप्रीतची जोडीदेखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे.

नेहाने शेअर केला रोका सेरेमनीचा व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी नेहा आणि रोहनप्रीतने त्यांच्या ‘रोका’ सेरेमनीचा व्हिडीओ शेअर केला होता. यात दोघेही आनंदात नृत्य करताना दिसले होते. हा व्हिडीओ शेअर करत नेहाने तिचे आगामी गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले होते. (Neha kakkars new song Nehu da vyah release today)

नेहा-आदित्यच्या लग्नाची चर्चा

‘इंडियन आयडॉल’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये नेहा आणि आदित्य नारायण हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असून ते लग्न करणार असल्याची अफवा पसरली होती. पण त्यांची ही लव्ह केमेस्ट्री फक्त कार्यक्रमापुरतीच मर्यादित होती.

कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी हा लव्ह अँगल तयार करण्यात आला होता. आदित्य नारायणच्या आधीही हिमांश कोहली हे नाव नेहासोबत जोडले गेले होते. नेहा आणि हिमांश अनेक दिवस एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. प्रेमात धोका मिळाल्यानंतर दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात लिहित असल्याचेही चाहत्यांनी पाहिले आहे. पण या सगळ्या चर्चेनंतर अखेर नेहाने लग्नाचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.(Neha kakkars new song Nehu da vyah release today)

‘या’ महिन्यात लग्नाची शक्यता

मीडिया रिपोर्टनुसार, रोहनप्रीत सिंह आणि नेहा कक्कर या महिन्याच्या शेवटच्या तारखेला विवाह करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘रोका’नंतर दोघांमध्येही लग्नाविषयी फायनल चर्चा झाली असल्याची म्हटले जात आहे.

View this post on Instagram

Jab we met! ♥️? @rohanpreetsingh ? #LoveAtFirstSight ?? #NehuDaVyah #NehuPreet

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on

कोण आहे रोहनप्रीत सिंग?

रोहनप्रीत सिंग ‘रायझिंग स्टार’ या गायन रियलिटी शोमध्ये पहिला रनरअप होता. तो बिग बॉस फेम शहनाज गिल या टीव्ही रिअ‍ॅलिटी शो ‘मुझसे शादी करोगे’ मध्येही चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. रोहनच्या आवाजाने त्याने अनेकांच्या मनात जागा मिळवली आहे. खरंतर, शहनाजसुद्धा रोहनला आवडत होती. पण रोहनने नेहासोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे दोघेही इंस्टाग्रामवर प्रेमाची कबूली देत अनेक पोस्ट शेअर करत आहेत.

(Neha kakkars new song Nehu da vyah release today)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.