शूटिंग केलेला कोणताही भाग वगळला जाणार नाही : अमोल कोल्हे

शूटिंग केलेला कोणताही भाग वगळला जाणार नाही. काय दाखवायचे काय नाही हा सर्वस्वी वाहिनीचा निर्णय असतो, असं अमोल कोल्हे (Amol Kolhe on Swarajya Rakshak Sambhaji Serial) म्हणाले.

शूटिंग केलेला कोणताही भाग वगळला जाणार नाही : अमोल कोल्हे
Follow us
| Updated on: Feb 22, 2020 | 3:04 PM

पुणे : स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांचे हाल दाखवू नयेत, अशी मागणी शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी (Amol Kolhe on Swarajya Rakshak Sambhaji Serial) केली. तसंच आपली मागणी मान्य केल्याचा दावाही खोतकर यांनी केला त्यावर राष्ट्रवादीचे खासदार आणि संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. असं कोणतंही आश्वासन मी दिलेले नाही. शूटिंग केलेला कोणताही भाग वगळला जाणार नाही. काय दाखवायचे काय नाही हा सर्वस्वी वाहिनीचा निर्णय असतो, असं अमोल कोल्हे म्हणाले.

“गेली अडीच वर्षे मालिका सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे, परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे, कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल,” असं खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

View this post on Instagram

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका २.५ वर्षे सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे.. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल! कृपया चुकीची बातमी दिली जाऊ नये ही विनंती .

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe) on

अर्जुन खोतकर काय म्हणाले?

स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेतील संभाजीराजेंना अटकेनंतरचा भाग दाखवू नये अशी मागणी अर्जुन खोतकर यांनी केली होती. याला अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संमती दाखवल्याची माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली. “संभाजीराजेंच्या अटकेनंतर त्यांचे जे हाल केले ते आम्हा सैनिकांना बघवणार नाही. त्यामुळं हा भाग वगळण्यात यावा” अशी मागणी खोतकरांनी केली (Amol Kolhe on Swarajya Rakshak Sambhaji Serial) होती.

यावर खासदार कोल्हे यांनी संमती दर्शवली अजून आता ही मालिका त्या ठिकाणीच थांबवण्यात येणार असल्याचा दावा खोतकरांनी केला होता.

सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख

संभाजी मालिका मी आता पाहिली नाही, त्यात काय सुरु आहे आणि अर्जुन खोतकर यांनी काय मागणी केली ती पण माहीत नाही. मी माहिती घेतो. जर मालिकेत काही चुकीचे असेल किंवा मालिकेमुळे काही वादाची परस्थिती निर्माण होत असेल, तर त्यासंबंधी काही तक्रारी सूचना असल्यास निर्णय घेऊ, असं सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी (Amol Kolhe on Swarajya Rakshak Sambhaji Serial) म्हटलं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.