औरंगाबादेत भरधाव कारची तिघींना धडक, दोघींचा जागीच मृत्यू, एक महिला गंभीर जखमी

भरधाव वेगात असलेल्या कारच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

औरंगाबादेत भरधाव कारची तिघींना धडक, दोघींचा जागीच मृत्यू, एक महिला गंभीर जखमी
Follow us
| Updated on: Mar 07, 2020 | 9:27 PM

औरंगाबाद : भरधाव वेगात असलेल्या कारच्या धडकेत (Aurangabad Car Hit Women) दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. औरंगाबादेतील जालना रोडवरील धुत रुग्णाल चौकात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकाच कुटुंबातील दोन महिलांवर काळाचा घाला झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या भीषण अपघातात तुळसाबाई दामोदर गायकवाड (वय 70), आशामती (Aurangabad Car Hit Women) विष्णू गायकवाड (वय 42) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आहिल्याबाई दादाराव गायकवाड (वय 50) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या तीनही महिला जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील देवठाणा येथील रहिवासी होत्या.

हेही वाचा : स्कॉर्पिओ आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू, 3 जखमी

या महिला आपल्या एका नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नासाठी औरंगाबादला आल्या होत्या. धुत हॉस्पीटल चौकात त्या रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. तेव्हा चिकलठाण्याहुन सिडको बसस्थानक चौकाकडे भरधाव वेगाने जात होती. या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सूटले आणि कारने या महिलांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तुळसाबाई गायकवाड आणि आशामती गायकवाड या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर आहिल्याबाई गायकवाड या गंभीर जखमी झाल्या.

अपघातानंतर कारचालक कारसह घटनास्थळावरुन पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तीन महिलांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तुळसाबाई गायकवाड आणि आशामती गायकवाड यांना मृत (Aurangabad Car Hit Women) घोषित केले. याप्रकरणाची नोंद औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

साताऱ्यात बोअरवेल ट्रक पलटी होऊन भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, 8 जखमी

अस्थीविसर्जनाहून परतताना काळाचा घाला, यवतमाळमध्ये अपघातात सात जणांचा मृत्यू

वीकेंडला फिरायला गेलेल्या मित्रांचा कार उलटून अपघात, एकाचा मृत्यू

साखरपुड्यावरुन परतताना कार-एसटीचा अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.