भाजपच्या विजयावर जुही चावला म्हणते, “हर बार मोदी सरकार”

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या इतक्या मोठ्या प्रक्रियेनंतर अखेर आज या निवडणुकांचा निकाल लागला. यंदाच्या लोकसभेतही जनतेने मोदी सरकारला भरघोस मतांनी विजयी केलं आहे. म्हणजेच यावेळी पुन्हा भाजप पक्ष सत्तेत आला आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये अनेक कलाकारांनीही आपलं नशीब आजमावलं. त्यापैकी काही जिंकून आले तर काहींना पराभवाचा सामना करावा लागला. यंदा इंडस्ट्रीतील सनी देओल, उर्मिला मातोंडकर, प्रकाश […]

भाजपच्या विजयावर जुही चावला म्हणते, “हर बार मोदी सरकार”
Follow us
| Updated on: May 24, 2019 | 9:37 AM

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या इतक्या मोठ्या प्रक्रियेनंतर अखेर आज या निवडणुकांचा निकाल लागला. यंदाच्या लोकसभेतही जनतेने मोदी सरकारला भरघोस मतांनी विजयी केलं आहे. म्हणजेच यावेळी पुन्हा भाजप पक्ष सत्तेत आला आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये अनेक कलाकारांनीही आपलं नशीब आजमावलं. त्यापैकी काही जिंकून आले तर काहींना पराभवाचा सामना करावा लागला. यंदा इंडस्ट्रीतील सनी देओल, उर्मिला मातोंडकर, प्रकाश राज, नुसरत जहां यांच्यासह अनेक कलाकारांनी निवडणूक लढवली. यामध्ये गुरुदासपूर लोकसभा मतदार संघातून भाजप उमेदवार सनी देओल हे बहुमताने निवडून आले, तर उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.

भाजपप्रणीत एनडीएचा दणदणीत विजय झाल्याने, देशातूनच नाही तर जगभरातून मोदी सरकारला शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यातच बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटिंनीही मोदी सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटिंनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

अभिनेत्री जूही चावला हिने लिहिले की, “लॅण्डस्लाईट व्हिक्टरीसाठी आमच्या पंतप्रधानांना अनेक शुभेच्छा. हर बार मोदी सरकार”.

गायिका आशा भोसले यांनी लिहिलं, “भारतीय मतदारांनी समजूतदारपणे मत दिलं. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनडीए, भाजप पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्वांना शुभेच्छा, ज्यांनी देशासाठी मेहनत केली. जय हिंद”

आधी अभिनेता आणि मग नेता बनलले प्रकाश राज लिहितात, “ही माझ्यासाठी जोरदार चपराक आहे. कारण यानंतर मला आणखी शिव्या, ट्रोलिंग आणि अपमान सहन करावा लागेल. पण मी माझ्या वक्तव्यावर कायम राहिल. धर्म निरपेक्ष भारतासाठी माझा लढा कायम राहिल. कठीण प्रवासाला आता नुकतीच सुरुवात झाली आहे. या प्रवासात माझी साथ देण्यासाठी धन्यवाद. जय हिंद.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विवेक ओबेरॉयनेही मोदी सरकारला शुभेच्छा दिल्या. त्याने ट्वीटरवर सिनेमाचं एक पोस्टर शेअर केलं, या पेस्टरवर ‘आ रहे हैं दोबारा पीएम नरेंद्र मोदी अब कोई रोक नहीं सकता’, असं लिहिलेलं आहे.

अभिनेता रितेश देशमुखनेही ट्वीट केलं. “भारताने निर्णय घेतला आहे. आता लोकशाहीचा उत्सव साजरा कररायचा आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना या शानदार विजयासाठी खूप खूप शुभेच्छा.”

निर्माती एकता कपूरनेही स्मृती इराणींसाठी एक पोस्ट शेअर केली. एकताने इंस्टग्रामवर लिहिले, “आमची नजर अमेठीवर आहे.”

View this post on Instagram

All eyes on #amethi we r rooting for our aunt

A post shared by Erk❤️rek (@ektaravikapoor) on

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.