पॅनकार्डच्या 'या' नियमात बदल

मुंबई : टॅक्स चोरी प्रकरणांवर आळा बसवण्यासाठी सरकारतर्फे पाच डिसेंबरपासून पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहे. या नवीन नियमांमध्ये आता 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त व्यापार करणाऱ्या संस्थाना पॅन कार्ड बनवणे अनिवार्य आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिलेल्या सूचनेनुसार जी संस्था 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करत असेल, त्यांना पुढच्यावर्षी 31 मेच्या आधी पॅन कार्डसाठी अर्ज […]

पॅनकार्डच्या 'या' नियमात बदल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मुंबई : टॅक्स चोरी प्रकरणांवर आळा बसवण्यासाठी सरकारतर्फे पाच डिसेंबरपासून पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहे. या नवीन नियमांमध्ये आता 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त व्यापार करणाऱ्या संस्थाना पॅन कार्ड बनवणे अनिवार्य आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिलेल्या सूचनेनुसार जी संस्था 2.5 लाख रुपयेपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करत असेल, त्यांना पुढच्यावर्षी 31 मेच्या आधी पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागणार आहे.

जर त्यांनी पॅन कार्ड काढले नाही, तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. टॅक्स विभागाने पॅन कार्डच्या नियमामध्ये अजून एक मोठा बदल केला आहे. ज्या मुलांचे वडील हयात नसतील किंवा वेगळे राहत असतील अशा मुलांना पॅन कार्डवर वडिलांच्या नावाचा समावेश करणे बंधनकारक नसेल.

पॅन कार्डच्या नव्या नियमामुसार जर कुणी एका वर्षात 2.5 लाखांचा व्यवहार करत असेल, तर त्यांना 31 मे पर्यंत पॅन कार्ड बनवणे बंधनकारक असेल. इनकम टॅक्स विभागात नोकरी करत असणारे मॅनेजिंग डायरेक्टर, डायरेक्टर, पार्टनर, ट्रस्टी यांसारख्या अधिकाऱ्यांकडे पॅनकार्ड नसेल, तर त्यांनाही 31 मेच्या आधी पॅन कार्ड काढणे बंधनकारक आहे.

पॅन कार्डच्या या नवीन नियमामुळे टॅक्स चोरीवर आळा बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या देशात टॅक्स चोरी करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सरकारला याचा फटका बसतो. याच कारणामुळे आयकर विभागाकडून  पॅन कार्डच्या नियमात बदल करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.