Aurangabad Corona : सकाळी 30 रुग्ण वाढले, दुपारी 28, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 900 पार

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत (Corona Patient increase Aurangabad) आहे.

Aurangabad Corona : सकाळी 30 रुग्ण वाढले, दुपारी 28, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 900 पार
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 6:24 PM

औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत (Corona Patient increase Aurangabad) आहे. मुंबई, पुणे या मोठ्या शहरानंतर आता औरंगाबादमध्येही कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. औरंगाबाद शहरात आज (16 मे) सकाळी तब्बल 30 जणांना तर दुपारनंतर 28 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 900 वर पोहोचला (Corona Patient increase Aurangabad) आहे.

त्याशिवाय औरंगाबादमध्ये गेल्या 24 तासात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा हा 25 वर जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे औरंगाबाद शहरातील संजय नगर परिसरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा हा तब्बल 106 वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे हा परिसर औरंगाबाद शहरातील अतिसंवेदनशील परिसर बनला आहे.

कोरोनाचा वाढता आकडा नियंत्रणात ठेवण्यासाठी औरंगाबाद शहरात सध्या पॅरामिल्ट्री फोर्स तैनात करण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनसह शहराच्या इतरही परिसरात हे जवान तैनात असणार आहेत. तर दुसरीकडे कंटेन्मेंट झोनमध्ये सुरू असलेली नागरिकांची वर्दळ कमी करण्यासाठी आता कंटेन्मेंट झोन परिसरात गस्ती पथक सुरू करण्यात आले आहेत. हे पथक दिवसातून दोन वेळा रेड झोन मध्ये गस्त घालणार आहे.

औरंगाबदमध्ये आज सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण हे एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), किराडपुरा (1), बजाज नगर (1), जिनसी रामनासपुरा (1), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (1), जहागीरदार कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), रोशन गेट (1) अन्य (7) या भागातील आहेत. यामध्ये 17 पुरुष आणि 13 महिला रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 29 हजार 100 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1068 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 6564 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित बातम्या : 

India Corona Update | कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत चीनच्या पुढे, आकडा 85 हजारांच्या पार

मालेगावात एकाच दिवसात 51 रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत एकूण 428 रुग्णांना डिस्चार्ज

कोरोनामुळे आणखी दोन पोलिसांचा मृत्यू, एका दिवसात 79 पोलिसांना कोरोना, बाधितांची संख्या 1140 वर

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.