Corona : गोव्यात 3 एप्रिलनंतर एकही नवीन रुग्ण नाही, इतर राज्यांची परिस्थिती काय?

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 11,933 वर पोहोचली आहे. तर 1,344 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत.

Corona : गोव्यात 3 एप्रिलनंतर एकही नवीन रुग्ण नाही, इतर राज्यांची परिस्थिती काय?
Follow us
| Updated on: Apr 16, 2020 | 12:28 AM

नवी दिल्ली : जगभरात आतापर्यंत 20 लाखाहून जास्त लोकांना (Corona Virus Update) कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 लाख 20 पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतात आरोग्य मंत्रालयानुसार, भारतात कोरोनाबाधितांची संख्या 11,933 वर पोहोचली आहे (Corona Virus Update). तर 1,344 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत. तर 392 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, भारतातील गोवा या राज्यातून एक आनंदाची बातमी येत आहे. गोव्यात कोरोना विषाणूचा सहावा रुग्णही बरा झाला आहे. आता गोव्यात फक्त एक कोरोनाबाधित रुग्ण आहे आणि 3 एप्रिलनंतर गोव्यात एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्रीन प्रमोद सावंत यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेच

महाराष्ट्र : भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित हे महाराष्ट्रात आहे. मुंबई आद कोरोनाचे 183 नवीन रुग्ण आढळून आले. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत 1936 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 113 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सध्या 2916 कोरोनाबाधित आहेत. तर राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 187 जणांचा मृत्यू झाला आहे.

आंध्र प्रदेश : आज सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात कोरोनाचे 23 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाचे 525 रुग्ण आहेत, तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

तेलंगाणा : आज 6 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत 514 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये आज 22 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले (Corona Virus Update). यापैकी 4 प्रकरणं हे जम्मूमधील आहेत आणि 18 काश्मीरची आहेत. सर्व 22 रुग्ण हे कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात होते. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे 300 रुग्ण आहेत. यापैकी 54 रुग्ण हे जम्मूतील तर इतर 246 हे काश्मीरमधील आहेत.

कर्नाटक : आज राज्यात 2 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 279 वर पोहोचली आहे. तर 80 कोरोनाबाधित हे बरे झाले आहेत आणि 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हिमाचल प्रदेश : आज हिमाचल प्रदेशात 115 जणांची कोरोना चाचणी झाली. यापैकी 23 जणांची चाचणी निगेटिव्ह आमि तर 92 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. राज्य सध्या कोरोनाबाधितांची संख्या 33 आहे. यापैकी 12 जण बरे झाले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पश्चिम बंगाल : राज्यात गेल्या 24 तासात 12 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 132 वर पोहोचली आहे तर 7 जणांचा कोरोनामुळे (Corona Virus Update) मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra corona update | रुग्णांची संख्या 3 हजारांजवळ, कुठे किती कोरोना रुग्ण?

देशभरात 1,344 जणांची कोरोनावर मात, 10,197 रुग्णांवर उपचार सुरु, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.