खडसे-महाजनांचं मनोमिलन, मात्र दोन गटांचे समर्थक जिल्हा परिषदेतच भिडले

गेली 35 वर्ष कार्यरत असलेले भाजपचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र सूर्यभान पाटील यांना डावलून महाजन गटातील अमित देशमुख यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांचा संताप झाला

खडसे-महाजनांचं मनोमिलन, मात्र दोन गटांचे समर्थक जिल्हा परिषदेतच भिडले
Follow us
| Updated on: Jan 06, 2020 | 3:36 PM

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील मनोमिलन झालं असतानाच जळगाव जिल्हा परिषदेत सभापतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. खडसे आणि महाजन यांच्या गटात जिल्हा परिषदेतच बाचाबाची (Khadse Mahajan Teams Rivalry) झाली.

अजिंठा गेस्ट हाऊसवर काल (रविवारी) गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांची सभापतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली होती. बैठकीत उमेदवारांची नावंही ठरली होती. रवींद्र सूर्यभान पाटील हे खडसे गटातील आहेत, तर अमित देशमुख हे महाजन गटातील आहेत.

गेली 35 वर्ष कार्यरत असलेले भाजपचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र सूर्यभान पाटील यांना डावलून महाजन गटातील अमित देशमुख यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांचा संताप झाला. त्यामुळे दोन गटात जिल्हापरिषदेमध्येच बाचाबाची झाली.

अखेर, रवींद्र पाटील आणि उज्ज्वला प्रशांत पाटील यांनी बंडखोरी करत सभापती आणि उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केले.

यावेळी भाजपचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, नंदू महाजन, गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी दोघांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांनी बोलण्यास नकार दिला. विश्रामगृहावर चला, असं सर्व जण सांगत होते. मात्र कोणीही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हतं. आम्हाला डावललं गेलं आहे, इतकंच त्यांचं म्हणणं होतं.

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारत आपला गड शाबूत ठेवला. भाजपने 34-30 असा विजय मिळवत, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला. जळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून रावेरच्या रजनी पाटील तर उपाध्यक्षपदी लालाचंद पाटील विजयी झाले. यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत भाजपचे वर्चस्व सिद्ध झालं आहे.

या विजयानंतर भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी एकमेकांना पेढा भरवून, आपल्यात कोणतीही कटुता नाही असं स्पष्ट केलं. तसंच जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून एकत्रच काम करत असतो, असंही खडसे आणि महाजन यांनी सांगितलं.

एकनाथ खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन जळगावात गेले होते. त्यावेळी तिघांची ब्रेकफास्ट करत चर्चा झाली. त्यानंतर खडसेंचं समाधान झाल्याचं बोललं जातं.

Khadse Mahajan Teams Rivalry

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.