देशभरात 1,344 जणांची कोरोनावर मात, 10,197 रुग्णांवर उपचार सुरु, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

देशभरात 1,344 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 397 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे (India corona patients).

देशभरात 1,344 जणांची कोरोनावर मात, 10,197 रुग्णांवर उपचार सुरु, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
कोरोनाचा संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच, जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल, तर तुम्ही या रोगाच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करु शकता.
Follow us
| Updated on: Apr 15, 2020 | 8:16 PM

नवी दिल्ली : देशभरात आतापर्यंत 1,344 जणांनी कोरोनावर मात केली आहे (India corona patients). कोरोनाविरोधात भारताची लढाई सुरु असून आतापर्यंत 11,933 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 1,344 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून 10,197 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 397 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली (India corona patients).

“कोरोनाचा सामना करण्यासाठी देशातील सर्व जिल्ह्यांची हॉटस्पॉट, नॉन हॉटस्पॉट आणि ग्रीन झोन अशा तीन भागात विभागणी करण्यात आली आहे”, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली. केंद्रीय आरोग्य आणि गृहमंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अग्रवाल बोलत होते.

“ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत किंवा कोरोनाचं संक्रमण वेगानं सुरु आहे, अशा जिल्ह्यांना हॉटस्पॉट जिल्हे घोषित करण्यात आलं आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण नाही त्या जिल्ह्यांना ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत 170 जिल्हे हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहेत. तर 207 जिल्हे नॉन हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहेत”, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.

“देशाच्या कॅबिनेट सचिवांनी आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिव, डीजीपी, आरोग्य सचिव, डीएम, एसपी, महापालिका आयुक्त यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी कोरोनाविरोधात जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या”, असं लव अग्रवाल म्हणाले.

संबंधित बातम्या :

भारतात वटवाघळामुळे कोरोना पसरला का? ICMR चे मराठमोळे संशोधक म्हणतात…..

कोरोना चाचणीच्या सक्तीने गरोदर महिला, डायलेसिस, केमोथेरपीसारख्या उपचारांना अडथळा : देवेंद्र फडणवीस

केंद्राकडे आमचे हक्काचे 16 हजार कोटी, वारंवार मागणी करुनही कोरोना लढ्यासाठी पैसे मिळेनात : बाळासाहेब थोरात

राजकारणात राजकीय संघर्ष नेहमीचा, कोरोनाचा पराभव हे आपले उद्दिष्ट : शरद पवार

मुंबईत नऊ वॉर्ड अतिगंभीर, ‘जी दक्षिण’मध्ये एका दिवसात 52 नवे कोरोनाग्रस्त, कोणत्या प्रभागात किती?

कोरोनाचे 2 नवे रुग्ण, वसई-विरार परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.