भारत बालाकोटपेक्षा मोठ्या कारवाईच्या तयारीत, इम्रान खानला भीती

भारत पाकव्याप्त काश्मीर (पाकिस्तानमध्ये आझाद काश्मीर म्हणून ओळख) मध्ये बालाकोटपेक्षाही मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पण आम्हीही त्याला चोख उत्तर देऊ, असंही इम्रान खानने (Imran Khan in PoK) म्हटलंय. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पीओकेमध्ये संबोधित करताना इम्रान खान यांनी हे वक्तव्य केलं.

भारत बालाकोटपेक्षा मोठ्या कारवाईच्या तयारीत, इम्रान खानला भीती
Follow us
| Updated on: Aug 14, 2019 | 5:46 PM

मुजफ्फराबाद, पीओके : काश्मीर प्रश्न घेऊन जगातील विविध देशांचा पाठिंबा मागणाऱ्या पाकिस्तानला अपयश आलंय. कुणीही मागणीकडे लक्ष न दिल्यानंतर आमच्यात युद्ध झालं, तर त्याला संपूर्ण जग जबाबदार असेल, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan in PoK) यांनी केली आहे. शिवाय भारत पाकव्याप्त काश्मीर (पाकिस्तानमध्ये आझाद काश्मीर म्हणून ओळख) मध्ये बालाकोटपेक्षाही मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पण आम्हीही त्याला चोख उत्तर देऊ, असंही इम्रान खानने (Imran Khan in PoK) म्हटलंय. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पीओकेमध्ये संबोधित करताना इम्रान खान यांनी हे वक्तव्य केलं.

काश्मीरसाठी आम्ही कोणत्याही पातळीला जाऊ, असं पाकिस्तानच्या लष्करप्रमुखानेही यावेळी म्हटलंय. भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी पाकिस्तानला सध्या भीती सतावत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद न मिळाल्यानंतर पाकिस्तानने आता युद्धाची धमकी देणं सुरु केलंय. यापूर्वीही पाकिस्तानने युद्धाची धमकी दिली आहे. काश्मीरप्रश्नी नरेंद्र मोदी यांनी मोठी चूक केली असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलंय.

नरेंद्र मोदी यांनी हे जे कार्ड वापरलंय, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचाच एक भाग होता. काश्मीरमध्ये जे पाऊल उचललंय, त्याने कर्फ्यू हटल्यानंतर काय परिस्थिती होईल याची आम्हाला भीती आहे. एवढी फौज पाठवा, नंतर पर्यटकांना काढून द्या एवढं करण्याची काय गरज होती. हे काय करायला निघाले आहेत? मी याला नरेंद्र मोदी यांचं धोरणात्मक ब्लंडर मानतो. त्यांनी त्यांचं शेवटचं कार्ड वापरलंय. भाजप आणि नरेंद्र मोदी यांना हे महागात पडणार आहे, अशी पोकळ धमकीही इम्रान खानने दिली.

भारत काहीतरी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची भीतीही इम्रान खानने व्यक्त केली. ”आम्हाला माहिती मिळाली आहे. सुरक्षेसंबंधी बैठक झाली, पाकिस्तान सैन्याला भारताच्या प्लॅनविषयी पूर्ण माहिती आहे. पुलवामानंतर भारताने ज्या पद्धतीने बालाकोटमध्ये कारवाई केली, त्यापेक्षाही भयंकर कारवाईचा प्लॅन पीओकेमध्ये केल्याची आम्हाला माहिती आहे. मी नरेंद्र मोदींना इथून आव्हान देतो, की तुम्हा कारवाई करा, ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’. पाकिस्तानी सैन्य तयार आहे. तुम्ही जे कराल, त्याचा सामना आम्ही अखेरपर्यंत करु,” अशी धमकीही इम्रान खानने दिली.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.