महाराष्ट्रातील लोकांना हे सरकार, मुख्यमंत्री नको आहेत : सुप्रिया सुळे

आम्हाला हे मुख्यमंत्री नको, असं चॅनलच्या सर्व्हेमध्ये लोकांनी सांगितलं. हे सरकार आणि मुख्यमंत्री बदलायला हवेत, असं आता लोकांना वाटत आहे, असं चॅनेलच्या सर्व्हेमध्ये दाखवल्या जात असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील लोकांना हे सरकार, मुख्यमंत्री नको आहेत : सुप्रिया सुळे
Follow us
| Updated on: Oct 19, 2019 | 9:50 AM

नाशिक : आम्हाला हे मुख्यमंत्री नको, असं चॅनलच्या सर्व्हेमध्ये लोकांनी सांगितलं. हे सरकार आणि मुख्यमंत्री बदलायला हवेत, असं आता लोकांना वाटत आहे (Supriya Sule on BJP). कारण या सरकारने पाच वर्षात भाषणांशिवाय आणखी काहीही केलं नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. या सरकारने फक्त लोकांना फसवायचं काम केलं आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला (Supriya Sule on BJP).

नाशिकच्या येवला येथे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सुप्रिया सुळे यांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर जोरदार टीका केली (Supriya Sule on BJP).

राज्यातील 55 ते 60 टक्के लोकांच्या मते, सत्ता परिवर्तन व्हायला हवं, असं चॅनलच्या सर्व्हेमध्ये दाखवण्यात येत आहे. दुसऱ्या सर्व्हेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून नकोत, असं सांगितलं जात आहे. हे मी नाही तर सर्व्हे म्हणत आहे. पण माझ्यामतेही हे सरकार जायला हवं कारण त्यांनी पाच वर्षात महाराष्ट्रासाठी काहीही केलेलं नाही, त्यांनी फक्त भाषणं केली आणि गाजराचा पाऊस पाडला, जुमले बस्स आणखी काहीही या सरकारने केलं नाही. यांनी फक्त सामन्यांना फसवण्याचं काम केलं आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

तसेच, सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेच्या 10 रुपयात थाळी या योजनेचीही खिल्ली उडवली. ‘यांचा शिव वडापाव 15 रुपयांत मिळतो आणि हे 10 रुपयांत थाळी देण्याचं बोलतात. हे कसं शक्य आहे. एक म्हणतो आम्ही 10 रुपयात थाळी देऊ, तर दुसरा म्हणतो 5 रुपयात थाळी सागंतो. आम्ही मराठी माणसं साधी आहोत, पण इतकी पण साधी नाही’, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर निशाणा साधला.

सुप्रिया सुळे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुनही सरकारला घेरलं. ‘यांचा सर्वात आवडता विषय म्हणजे, आम्ही सत्तेत आलो की, कर्जमाफी करु. मला त्यांना आठवण करु द्यावी वाटते की, तुम्ही सत्तेत आहात. त्यांना अजूनही असं वाटतं की, ते सत्तेत नाहीत आणि आम्हाला अजूनही वाटतं की, आम्ही सत्तेत आहोत. कारण आम्ही कामं करतो’, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी युती सरकारवर टीका केली.

प्रशासनाचा अनुभव खूप महत्त्वाचा असतो. उत्तम प्रशासक असेल तर त्याला सत्तेत असल्याने किंवा नसल्याने फरक पडत नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच, यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.