मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक विभागात पाणी साचलं आहे. त्याचा संपूर्ण परिणाम वाहतुकीवर होत आहे.
दादर पूर्व, किंग्ज सर्कल येथेही पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
रस्त्यावरही पाणीच पाणी साचल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
नवी मुंबईतही काल रात्री पासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
उपनगरातही मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे. अंधेरी सबवे येथेही पाणी साचल्यामुळे पश्चिमेकडील जाणारा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.
मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वेवरही झाला आहे.