मुख्यमंत्री घराबाहेर पडेनात, कारभार फेसबुकवरुन चालणार का? : राधाकृष्ण विखे पाटील

"शेतकरी आणि जनतेची चिंता न करता नगर जिल्ह्यातील तीनही मंत्री मुंबईत जावून बसलेत", असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला (Radhakrishna Vikhe patil slams CM Uddhav Thackeray).

मुख्यमंत्री घराबाहेर पडेनात, कारभार फेसबुकवरुन चालणार का? : राधाकृष्ण विखे पाटील
Follow us
| Updated on: May 19, 2020 | 9:35 PM

अहमदनगर : “कोरोनाच्या संकंटात राज्यातील जनतेला दिलासा देण्यात राज्य सरकार (Radhakrishna Vikhe patil slams CM Uddhav Thackeray) अपयशी ठरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री फेसबुकवरच संवाद साधतात. त्यामुळे सरकारचा कारभार यापुढे आता फक्त फेसबुकवर चालणार का?”, असा खोचक सवाल भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe patil slams CM Uddhav Thackeray) यांनी केला आहे.

“केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची राज्यात अंमलबजावणी केली जात नाही. केंद्राने दिलेल्या निधीचा योग्य उपयोग राज्य सरकार करत नाही”, असा गंभीर आरोप विखे पाटलांनी केला. भाजपतर्फे आज (19 मे) राज्यभरात ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करण्यात आलं. त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून विखे पाटलांनी तहसीलदारांना निवेदन दिलं. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

“शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. दुधाला सरसकट पाच रुपये अनुदान द्यावं, शेतकऱ्यांसाठी त्वरित आर्थिक पॅकेज जाहीर करावं”, अशी मागणी विखे पाटलांनी केली.

“शेतकरी आणि जनतेची चिंता न करता नगर जिल्ह्यातील तीनही मंत्री मुंबईत जावून बसलेत”, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि राज्यमंत्री प्रसाद तनपुरे यांना लगावला.

“परप्रांतिय कामगारांसाठी उपाययोजना नाहीत. मजुरांची जीवघेणी पायपीट सुरु आहे. मात्र त्यांची कोणतीही काळजी सरकारला नाही. राज्याच्या विकासात परप्रांतियांचादेखील वाटा आहे. मात्र राज्य सरकारकडून त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही”, अशी टीका विखे पाटलांनी केली.

“वाधवानचा बागबान कोण? या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. मात्र अमिताभ गुप्तांना क्लिनचिट दिली गेली”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.