‘कोरोना’ संकटामुळे पुढच्या वेळी भेटू, राहुल गांधींचा नाना पटोलेंना निरोप

सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र ही चर्चा तूर्तास टळली आहे. (Rahul Gandhi asks Nana Patole to meet next time ahead of Corona Lockdown)

'कोरोना' संकटामुळे पुढच्या वेळी भेटू, राहुल गांधींचा नाना पटोलेंना निरोप
Follow us
| Updated on: May 28, 2020 | 11:11 AM

नवी दिल्ली : ‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते नाना पटोले आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट टळली. ‘कोरोना’ संकटामुळे आपण पुढच्या वेळी भेट घेऊ, असा निरोप राहुल गांधी यांच्याकडून नाना पटोले यांना देण्यात आला. (Rahul Gandhi asks Nana Patole to meet next time ahead of Corona Lockdown)

नाना पटोले दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी परवा (मंगळवार 26 मे) दिल्लीला रवाना झाले होते. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ही चर्चा तूर्तास टळली आहे.

हेही वाचा : कोरोना लढाईत आम्ही आपल्यासोबत, राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन

महाराष्ट्रात शिवेसना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आहे. मात्र काँग्रेस नेत्यांच्या मनात हे सरकार “आपलं नाही, शिवसेनेचं” असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून फेर धरत होत्या.

नाना पटोले काय म्हणाले होते?

राज्यातील विधानसभा अधिवेशन सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील सरकार कोणाचे आहे, असा प्रश्न विचारला जातो. मात्र हे सरकार महाविकास आघाडीचं सरकार आहे. निर्णय सर्व पक्ष मिळून घेतात, त्यामुळे यावर बोलणे योग्य नाही. सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला अधिकार नाहीत, असे मत राहुल गांधी आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले आहे, यावर मी बोलणे योग्य नाही. राज्यपालांच्या माध्यमातून सरकार पाडणे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची खेळी करणे चुकीचे आहे, असे मत नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत व्यक्त केले होते.

महाराष्ट्रात आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही : राहुल गांधी

“महाराष्ट्र सरकारला आमचा पाठिंबा आहे, मात्र आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणं आणि सरकारला पाठिंबा देणं हा यात फरक आहे”, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली होती. (Rahul Gandhi asks Nana Patole to meet next time ahead of Corona Lockdown)

संबंधित बातमी :

महाराष्ट्रातील सरकार कुणाचे? दिल्लीत पोहोचताच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले….

(Rahul Gandhi asks Nana Patole to meet next time ahead of Corona Lockdown)

Non Stop LIVE Update
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.