राष्ट्रवादीने भाजपच्या मोहजाळात फसू नये, राजू शेट्टी यांचा सल्ला

राज्यात महासेनाआघाडीचे सरकार सत्तेत येण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे किमान समान कार्यक्रमावर अजून एकमत झालेलं नाही. असं असतानाच राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल, अशी जोरदार चर्चाही सुरु आहे

राष्ट्रवादीने भाजपच्या मोहजाळात फसू नये, राजू शेट्टी यांचा सल्ला
Follow us
| Updated on: Nov 18, 2019 | 8:02 PM

मुंबई : ‘राष्ट्रवादीने भाजपच्या मोहजाळात फसू नये, ते सर्वसामान्य जनतेला ते कदापि मान्य होणार नाही’, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ट्विटरवरुन दिला (Raju Shetti Advice to NCP). राजू शेट्टी यांनी पाच वाजताच्या सुमारास हे ट्वीट केलं. राज्यात महासेनाआघाडीचे सरकार सत्तेत येण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे किमान समान कार्यक्रमावर अजून एकमत झालेलं नाही. असं असतानाच राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल, अशी जोरदार चर्चाही सुरु आहे (Raju Shetti Tweet).

यासर्व परिस्थितीला पाहता राष्ट्रवादीने भाजप मोहजाळात फसू नये, असा सल्ला राजू शेट्टी यांनी दिला आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याच्या वेगवान हालचाली सुरु आहेत. किमान समान कार्यक्रमात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि विजमाफी दिल्यास स्वाभिमानी या आघाडीसोबत असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीने भाजपसोबत जाऊ नये, या आशयाचं ट्विट केलं. शेट्टीच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

अन्यथा भाजप आणि महासेनाआघाडीत काहीच फरक राहणार नाही : राजू शेट्टी

भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना महासेनाआघडी सोबत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ असं जाहीर केलं होतं. त्यानुसार, किमान समान कार्यक्रमात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अन्यथा भाजप आणि नव्याने होऊ घातलेल्या महासेनाआघाडीत काहीच फरक राहणार नाही, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी ‘टीव्ही-9 मराठी’सोबत बोलताना दिली.

शिवसेनेसोबत जाण्यास काही जण नाराज : शरद पवार 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar meet Sonia Gandhi) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधून चर्चेचा तपशील सांगितला. “आम्ही राज्यातील राजकारणाविषयी चर्चा केली. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबद्दल त्यांना माहिती दिली. इतर कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही नजर ठेवणार पुढे पावलं काय असणार हे ठरणार. या स्थितीबाबत त्यांचा विचार काय याबाबत चर्चा करणार. कोणासोबत सरकार बनवावं याबाबत कोणतीही चर्चा नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येण्यावर काही जण नाराज आहेत. राजकीय स्थितीबाबत चर्चा करताना युती झालेल्या पक्षांनाही सोबत घेतलं पाहिजे. कोणासोबतच जायचं की नाही याबाबतच चर्चा झाली नाही”, असं यावेळी शरद पवारांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.