रामनवमी किंवा अक्षय तृतीयेला राम मंदिराचा शुभारंभ : गोविंदगिरी महाराज

रामनवमी किंवा अक्षय तृतीयेला राम मंदिराचा शुभारंभ होणार आहे. या संदर्भात प्रयागमधील संत महंत बैठकीत निर्णय घेण्यात आला. साधारण दोन वर्षात हे मंदिर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

रामनवमी किंवा अक्षय तृतीयेला राम मंदिराचा शुभारंभ : गोविंदगिरी महाराज
Follow us
| Updated on: Feb 06, 2020 | 10:31 PM

पुणे : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता राम मंदिराची निर्मिती दृष्टीपथात आली आहे (Ram Mandir Built Up). रामनवमी किंवा अक्षय तृतीयेला राम मंदिराचा शुभारंभ होणार आहे. या संदर्भात प्रयागमधील संत महंत बैठकीत निर्णय घेण्यात आला. साधारण दोन वर्षात हे मंदिर पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मंदिराच्या लढ्यात कार सेवकांचे योगदानही मोठं आहे त्यामुळे मंदिर परिसरात स्मारकाच्या माध्यमातून स्मृती जागवल्या जाणार असल्याचं विश्वस्त गोविंदगिरी महाराज यांनी सांगितलं (Ram Mandir Built Up).

गेल्या वीस वर्षांपासून मंदिराच्या उभारणीसाठी लागणाऱ्या पाषाणाला घडवायचं काम सुरु आहे. 85 टक्के पेक्षा जास्त काम झालं असून दोन वर्षाच्या आत मंदिर पूर्ण होणार असल्याचे गोविंद गिरी महाराज यांनी सांगितले.

हा भारताच्या इतिहासातील मंगलमय क्षण असून रामाच्या भव्य मंदिरासाठी अनेक शतकांचा लढा सुरु होता. हा लढा आता संपला असून ज्या सरकारने हे काम केलं त्यांचं अभिनंदन गोविंद गिरी महाराजांनी व्यक्त केलं. सर्वजण भारताचे नागरिक असून देशाचा प्राण रामचंद्र आहे. महात्मा गांधी देखील राम नामाचा जप करत होते. त्यामुळे आजचा क्षण महत्वाचा आहे. भव्य राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. विश्वस्त पदी माझी निवडही भगवंताची कृपा असून खारीचा छोटासा वाटा उचलण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं.

“या संदर्भात जय पराजय असा भाग नाही. अनेक पिढ्यांचं स्वप्न साकारला असून राम मंदिरासोबतच राम मंदिर उभारण्याचा संकल्प करुया. अजिंक्य, वैभवशाली संपन्न देश उभारण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केलं. रामाने मानवतेचा संदेश दिला असून सर्वांनासोबत घेऊन जाण्याची भूमिका आम्ही घेतली”, असंही गोविंद गिरी महाराजांनी सांगितलं.

“या निर्णयाचे 97 टक्के लोक आनंदाने स्वागत करत आहेत. तर काही लोकांना भडकावून एखादा विरोधी स्वर लावला, तर ते महत्वाचं ठरत नसल्याचं गोविंद गिरी महाराजांनी म्हटलं. काहींचं नेतृत्व काही लोकांना भडकवल्या शिवाय जिवंत राहू शकत नाही. या लोकांकडे लक्ष देण्याची गरज नाही. 98 टक्के पेक्षा जास्त समाज मंदिरासाठी सहयोग करतोय. हे मंदिर राष्ट्रीय एकात्मता आणि भारताच्या विजय पर्वाच प्रतीक आहे”, अशी भावना गोविंद गिरी महाराजांनी व्यक्त केली.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.