इंदोरीकर महाराजांच्या वादावर सिंधूताई सपकाळ यांचं मोठं विधान
इंदूरीकर महाजारांच्या वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादावर सिंधूताई सपकाळ यांनी खंत व्यक्त केली (Sindhutai sapkal on Indurikar Maharaj statement).
मुंबई : काही पौराणिक दाखले देत असताना कीर्तनकार इंदोरीकर महाराज नकळत बोलून गेले असतील. त्याचं इतकं का भांडवल करताय? असा सवाल करत सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी इंदोरीकर महाराजांना पाठिंबा दर्शवला आहे (Sindhutai Sapkal on Indurikar Maharaj). इंदोरीकर महाजारांच्या वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादावर सिंधूताई सपकाळ यांनी खंत व्यक्त केली.
सिंधूताईंचा इंदूरीकर महाराज आणि टीकाकऱ्यांना सल्ला
“इंदोरीकरांचं योगदान फार मोठं आहे. त्यांनी आपल्या प्रबोधनातून तरुणांना वाईट मार्गातून बाजूला करत स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला. त्यामुळे त्यांनी आपण चुकलो असं म्हणत आपलं कार्य सुरु ठेवावं”, असा सल्ला सिंधूताईंनी इंदोरीकरांना दिला आहे (Sindhutai Sapkal on Indurikar Maharaj). याशिवाय टीका करणाऱ्यांनाही महाराजांच्या शब्दाला धरुन न बसता त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन वाद मिटवता घ्यावा, असा सल्ला सिधूताईंनी दिला.
इंदोरीकर महाराजांकडून दिलगिरी व्यक्त
दरम्यान, सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी अखेर दिलगिरी (Indorikar Maharaj apologize) व्यक्त केली आहे. “समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. 26 वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंग्रह, अंधश्रद्धा निर्मूलन विवीध जाचक रुढी परंपरा यावर मी भर दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. तमाम महिलावर्गाची दिलगिरी”, असं इंदोरीकर महाराजांनी म्हटलं. इंदोरीकर महाराजांनी पत्रक प्रसिद्ध करुन दिलगिरी (Indorikar Maharaj apologize) व्यक्त केली.