Chandrayaan | अमेरिकेने एकादशीला यान सोडल्याने यशस्वी : संभाजी भिडे
अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडला कारण त्या दिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते. त्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे म्हणाले.
सोलापूर : अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडला कारण त्या दिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते. त्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide )म्हणाले. ते (Sambhaji Bhide) सोलापुरात बोलत होते.
भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नसून एक सेकंदांचा हजारावा भाग मोजण्याची पद्धत सुद्धा भारतीय कालपमापन पद्धतीमध्ये आहे. अमेरिकेने याच कालमापन पद्धतीचा वापर केल्यामुळे त्यांचा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयोग यशस्वी झाला, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलंय. नवरात्रीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीने राज्यभर दुर्गामाता दौड होणार आहे त्यासाठी सोलापुरात आयोजित बैठकीला संभाजी भिडे आले होते. त्यावेळी त्यांनी मिशन चंद्रयानबद्दल आपलं मत व्यक्त केलं.
VIDEO : Chandrayaan : अमेरिकेने एकादशीला यान सोडल्याने यशस्वी : संभाजी भिडे pic.twitter.com/n9CJGmWGq7
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 9, 2019
अमेरिकेने आतापर्यंत 38 वेळा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. तेव्हा नासाच्या वैज्ञानिकाने भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि उपग्रह सोडला आणि तो यशस्वी झाला. अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडला कारण त्या दिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते. त्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला, असं संभाजी भिडे म्हणाले.
मिशन चंद्रयान
भारताची महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान 2’ (Chandrayan 2) मोहीम अगदी शेवटच्या टप्प्यात असताना विक्रम लँडरचा इस्रो (ISRO) संपर्क (Vikram Lander crashed on moon surface) तुटला. त्यानंतर इस्रोचे शास्त्रज्ञ (Mission Chandrayaan 2) पुन्हा एकदा जोमात कामाला लागले आणि त्यांनी विक्रम लँडरचा शोध घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
इस्रो प्रमुख के. शिवन यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, “नुकतंच आम्हाला विक्रम लँडर नेमकं कुठे आहे याचा शोध लागला आहे. चंद्रयान 2 चे ऑर्बिटरने याबाबतचा एक फोटो पाठवला असून त्यात विक्रम लँडर दिसत असल्याचे प्रमुखांनी म्हटलं आहे. मात्र अद्याप विक्रम लँडरची इस्रोचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. मात्र लवकरच आम्ही विक्रम लँडरशी संपर्क साधू,” असे के. शिवन यांनी सांगितले आहे.
‘चंद्रयान 2’ सात सप्टेंबर 2019 च्या मध्यरात्री एक वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग (Soft Landing on Lunar Surface) करणार होतं. 30 किलोमीटर अंतरावर स्थिरावलेल्या लँडरने चंद्राच्या दिशेने कूच करताना ‘रफ ब्रेकिंग फेस’ (Rough Breaking Phase) या अडथळ्यावरही मात केली. मात्र चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना ‘विक्रम’चा इस्रोच्या ग्राऊण्ड स्टेशनशी संपर्क (Vikram lander connection lost) तुटला.
‘चंद्रयान 2’चा ऑर्बिटर 100 किलोमीटर अंतरावर असून आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. चंद्राभोवती फेऱ्या घालून ऑर्बिटरही बरीचशी माहिती गोळा करणार आहे.
चंद्रयान 2 मोहीमेत विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर 20-20 तास काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचा हिरमोड झाला. परंतु इस्रोने अपेक्षा सोडलेली नव्हती. कारण, आकडेवारीचं विश्लेषण सध्या केलं जात असून लवकरच याबाबत घोषणा केली जाईल.
चमत्कारिकरित्या विक्रम लँडरशी संपर्क झाल्यास भारताच्या नावावर नव्या इतिहासाची नोंद होईल. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा रशिया, यूएस आणि चीननंतर चौथा देश ठरणार आहे. मात्र आजवर कधीही समोर न आलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचं मिशन आखणारा भारत हा एकमेव देश आहे.
संबंधित बातम्या
Chandrayaan-2 : नासाकडून कौतुकाची थाप, इस्रोला मोठी ऑफर
चंद्रयान 2 : यश मिळालं तर आपलं, अपयश आलं तरीही आपलंच, इस्रोच्या 2 रॉकेट वुमनचा देशाला अभिमान
‘चंद्रयान-2’चं नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना अक्षय कुमारच्या शुभेच्छा
Mission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच का उतरणार
Mission Chandrayaan-2 : मिशन ‘चंद्रयान 2’ फतेह, चंद्रयान अवकाशात झेपावलं