सावित्री नदीसारखी दुर्घटना टळली, गाड्या गेल्या आणि पूल खचला

चेतन व्यास,टीव्ही 9 मराठी, वर्धा : वर्ध्यातील महाकाली मार्गावरील 52 वर्ष जुना पूल खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुदैवाने महाडजवळच्या सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली. खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा,कोंढाळी मार्गावरील धाम नदीवर हा पूल आहे. रात्री 11 च्या सुमारास पुलाच्या मध्यभागातील पिलर खचला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहनं निघून गेल्यानंतर हा […]

सावित्री नदीसारखी दुर्घटना टळली, गाड्या गेल्या आणि पूल खचला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:03 PM

चेतन व्यास,टीव्ही 9 मराठी, वर्धा : वर्ध्यातील महाकाली मार्गावरील 52 वर्ष जुना पूल खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुदैवाने महाडजवळच्या सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली.

खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा,कोंढाळी मार्गावरील धाम नदीवर हा पूल आहे. रात्री 11 च्या सुमारास पुलाच्या मध्यभागातील पिलर खचला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहनं निघून गेल्यानंतर हा पूल खचला.

याबाबतची माहिती खरांगणा पोलिसांना मिळताच ठाणेदार संतोष शेगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या ठिकाणची वाहतूक तात्काळ थांबवली. हा पूल राज्य महामार्गावर असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो.

साधारण 1964 मध्ये पुलाची निर्मिती झाली आहे. 52 वर्षात मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक झाली आहे. या मार्गाचा इतर मार्गाच्या तुलनेत मध्यप्रदेशमधून हैदराबादकडे जाण्यासाठी उपयोग होतो. या पुलामुळे जवळपास 100 किलोमीटरचा फेरा वाचतो. शिवाय टोल वाचवण्यासाठी या मार्गाचा उपयोग होते. महाकालीचे प्रसिद्ध देवस्थानसुद्धा या मार्गावर आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.