वजन कमी करण्यासाठी उकडलेल्या तांदळाचे पाणी ठरेल फायदेशीर, वजन कमी होण्यासोबतच बीपी राहील नियंत्रणात

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत वजन वाढण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण वजन वाढल्यामुळे आजार होण्याची शक्यता निर्माण होते. अनेक प्रयत्न करून देखील वाढलेले वजन कमी होत नाही. यासाठी उकडलेल्या तांदळाचे पाणी महत्त्वाचे ठरते. त्याचा योग्य वापर केल्यास अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येते. तसेच हे पाणी वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

वजन कमी करण्यासाठी उकडलेल्या तांदळाचे पाणी ठरेल फायदेशीर, वजन कमी होण्यासोबतच बीपी राहील नियंत्रणात
Follow us
| Updated on: Jan 22, 2025 | 3:39 PM

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अनियमित जीवनशैलीमुळे लोकांमध्ये अनेक प्रकारचे आजार होत आहेत. लठ्ठपणा हे याचे सर्वात मोठे कारण ठरत असून लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब मधुमेहासह या संबंधित अनेक आजारही होतात. वजन कमी करण्यासाठी लोक विविध पद्धतींचा अवलंब करतात. परंतु काही वेळा सर्व प्रयत्न अपयशी ठरतात. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात पण वजन कमी होत नाही. कधी कधी काही लोक वजन कमी करण्यासाठी औषधांचा वापर सुद्धा करतात. त्यामुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढत जातात. यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊ जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करतील. हे उपाय वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात असे तज्ञांचे मत आहे. जाणून घेऊ कोणते आहेत ते उपाय

या पाण्यात असतात मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे

आहार तज्ञ डॉक्टर परमजीत कौर सांगतात की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तांदूळ उकडलेले पाणी फायदेशीर ठरू शकते. या पाण्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असून अनेक आजारांवर हे फायदेशीर ठरते. उकडलेल्या तांदळाच्या पाण्याचे काही फायदे जाणून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. हे पाणी पिल्याने तुम्ही पचन क्रिया चांगली राहते. तसेच बीपी ही नियंत्रणात राहतो याशिवाय लठ्ठपणा कमी होतो. या पाण्यात असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

उकडलेल्या तांदळाच्या पाण्याचा असा करा वापर

जर तुम्ही रोज उकडलेल्या तांदळाचे पाणी पिले तर तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागते. या पाण्यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. हे पाणी पिल्याने तुमच्या शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी सहज कमी होते. हे पाणी तयार करण्यासाठी तुम्हाला तांदळात जास्त पाणी ठेवून शिजवावे लागेल आणि तांदूळ शिजल्यावर ते गाळून घ्यावे लागेल. यानंतर तांदळाचे पाणी थंड करून प्या. वजन कमी करण्यासाठी हा सर्वात प्रभावी आणि सोपा उपाय आहे.

स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी.
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला.
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार.
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही.
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले...
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले....
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी.