200 अमेरिकी कंपन्यांची चीनऐवजी भारताला पसंती

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या जवळजवळ 200 कंपन्यांनी आपले उत्पादन केंद्र (मॅन्युफॅक्चरिंग सेंटर) तयार करण्यासाठी भारताला पसंती दिली आहे. या कंपन्या निवडणुकीनंतर आपले केंद्र चीनमधून भारतात नेण्यास इच्छुक आहेत. अमेरिका आणि भारताचे संबंध मजबूत करण्यासाठी काम करणाऱ्या ‘यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम’ या स्वयंसेवी समुहाने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले, “चीनऐवजी अन्य ठिकाणी पर्याय शोधणाऱ्या कंपन्यांसाठी […]

200 अमेरिकी कंपन्यांची चीनऐवजी भारताला पसंती
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या जवळजवळ 200 कंपन्यांनी आपले उत्पादन केंद्र (मॅन्युफॅक्चरिंग सेंटर) तयार करण्यासाठी भारताला पसंती दिली आहे. या कंपन्या निवडणुकीनंतर आपले केंद्र चीनमधून भारतात नेण्यास इच्छुक आहेत.

अमेरिका आणि भारताचे संबंध मजबूत करण्यासाठी काम करणाऱ्या ‘यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम’ या स्वयंसेवी समुहाने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले, “चीनऐवजी अन्य ठिकाणी पर्याय शोधणाऱ्या कंपन्यांसाठी भारतात चांगल्या संधी आहेत.” या समुहाचे प्रमुख मुकेश अघीने यांनी सांगितले, “अनेक कंपन्या माझ्याशी बोलत आहे. भारतात गुंतवणूक करुन चीनला पर्याय म्हणून ते विचारणा करत आहेत. भारतात निवडणुकीनंतर नव्या सरकारला व्यापारासाठीच्या सुधारणांमध्ये गती आणण्याबाबतही आम्ही बोलणार आहोत.”

एका मुलाखतीत बोलताना मुकेश अघी म्हणाले, “मला वाटते हे खूप संवेदनशील आहे. आम्हाला प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणायची आहे. त्यासाठी 12 ते 18 महिन्यांमध्ये यावर चर्चा करुन अधिक योग्य निर्णय घेतला जाईल. ई-कॉमर्स, माहितीचे स्थानिक ठिकाणी स्टोरेज अशा निर्णयांवरही अमेरिकी कंपन्या विचार करत आहेत.”

गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी नव्या सरकारला काय करायला हवे, असे विचारल्यानंतर अघी म्हणाले, “नव्या सरकारला सुधारणांचा वेग वाढवावा लागेल. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणायला हवी. अधिक पक्षांसोबत चर्चेवर जोर द्यायला हवा.” भारत आणि अमेरिकेमधील मुक्त व्यापार कराराचेही घनी यांनी समर्थन केले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.