भारत पुन्हा पाकवर हल्ला करणार, पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांचा दावा

कराची : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी (Shah Mahmood Qureshi) यांनी भारत पाकिस्तानवर पुन्हा हल्ला करणार आहे, असा थेट आरोप केला आहे. भारत पाकिस्तानवर आणखी एक हल्ला करण्याच्या तयारीत आहे, असं शाह महमूद कुरैशी यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं. इस्लामाबादने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या सदस्यांकडे याबाबत चिंता व्यक्त केली. इतकंच नाही, तर भारत […]

भारत पुन्हा पाकवर हल्ला करणार, पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांचा दावा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

कराची : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी (Shah Mahmood Qureshi) यांनी भारत पाकिस्तानवर पुन्हा हल्ला करणार आहे, असा थेट आरोप केला आहे. भारत पाकिस्तानवर आणखी एक हल्ला करण्याच्या तयारीत आहे, असं शाह महमूद कुरैशी यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं. इस्लामाबादने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या सदस्यांकडे याबाबत चिंता व्यक्त केली. इतकंच नाही, तर भारत 16 ते 20 एप्रिलदरम्यान पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याचा दावा शाह महमूद कुरैशी यांनी केला.

भारताने पाकिस्तानवर हल्ला करावा असं इम्रान खान सरकारला वाटत नाही. तसेच, “आमच्याकडे भारताच्या या षड्यंत्राबाबत सर्व माहिती आहे”, असा दावाही कुरैशी यांनी केला. तर पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालोकोट येथे दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला होता. त्यावर “27 फेब्रुवारीला जेव्हा भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, तेव्हा सर्वांना हे माहित होतं की भारताने आंतरराष्ट्रीय कायद्यांचं आणि संयुक्त राष्ट्र चार्टरच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. तरीही संपूर्ण जग शांत होतं”, असा सवालही कुरैशी यांनी उपस्थित केला.

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या आतंकवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. याविरोधात कारवाई करताना 27 फेब्रुवारीला भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांचा खात्मा केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने पुन्हा भारतात घुसन्याचा प्रयत्न केला होता.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.