काश्मीरप्रश्नी बोलताना इम्रान खान यांनी अटलजींची आठवण सांगितली!

इस्लामाबाद : काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा उपाय नाही, चर्चेतूनच प्रश्न सुटू शकतो, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मांडले. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानातील वरिष्ठ पत्रकारांशी इम्रान खान यांनी खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काश्मीरप्रश्नासह विविध मुद्द्यांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. अटलजी म्हणाले होते…. काश्मीर प्रश्न सुटू शकतो का, असे पत्रकारांनी इम्रान खान यांनी विचारले असता, […]

काश्मीरप्रश्नी बोलताना इम्रान खान यांनी अटलजींची आठवण सांगितली!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

इस्लामाबाद : काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा उपाय नाही, चर्चेतूनच प्रश्न सुटू शकतो, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मांडले. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानातील वरिष्ठ पत्रकारांशी इम्रान खान यांनी खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काश्मीरप्रश्नासह विविध मुद्द्यांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. अटलजी म्हणाले होते…. काश्मीर प्रश्न सुटू शकतो का, असे पत्रकारांनी इम्रान खान यांनी विचारले असता, त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबतच्या चर्चेचा प्रसंग सांगितला. “भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नटवर सिंग यांनी मला एकदा सांगितले होते की, जनरल मुशर्रफ यांच्या कार्यकाळात काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याच्या ते अगदी जवळ आले होते. म्हणजेच, काश्मीर प्रश्नावर नक्कीच काहीतरी व्यावहारिक उपाय निघू शकतो.” असे म्हणत इम्रान खान यांनी आशा व्यक्त केल्या.

दोन-तीन मार्ग आहेत… जोपर्यंत चर्चा होत नाही, तोपर्यंत काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी इतर पर्यायांचा विचार होऊ शकत नाही, असेही इम्रान खान म्हणाले. ज्यावेळी उपस्थित पत्राकारांनी त्यांना काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी पर्यायांची विचारणा केली, तर ते म्हणाले, “दोन-तीन मार्ग आहेत, ज्यावर विचार सुरु आहे. मात्र, एवढ्यात ते पर्याय, मार्ग सांगणे उचित ठरणार नाही.” शांतता प्रस्थापित व्हावी… भारताविरोधात कोणत्याही प्रकारच्या युद्धाच्या शक्यता इम्रान खान यांनी फेटाळल्या. ते म्हणाले, “अण्वस्त्र संपन्न असलेले दोन देश युद्ध करु शकत नाहीत. कारण त्याचा परिणाम भयंकर होतो. भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान गंभीर आहे. पाकिस्तानचं लष्कर आणि आमच्या सरकारचा उद्देश सुद्धा भारतासोबत शातंता प्रस्थापित व्हावी, हाच आहे.”

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.